शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

कर्जमाफीच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या, यंदा १९७ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 6:56 PM

अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्यात, हे उल्लेखनीय. यंदाच्या खरिपात पेरणीपासूनच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे दुबार-तिबार पेरणीचे ...

अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्यात, हे उल्लेखनीय. यंदाच्या खरिपात पेरणीपासूनच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढवले. खरिपाच्या मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या सरासरी उत्पादनात घट झाली आहे. शासनाने २८ जुनला  शेतक-यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. मात्र, खरिपातील पिके पावसाअभावी माना टाकत असल्याने जगावे कसे, या विवंचनेत असलेल्या शेतक-यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. थकबाकीदार असल्याने बँकांनी कर्ज नाकारले. त्यातच तातडीच्या १० हजारांच्या कर्जवाटपाची घोषणा शासनाने केली. तथापि  प्रत्यक्षात एकाही शेतक-याला कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. सलग नापिकीमुळे शेतक-यांवरील कर्ज वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्याची नोंद आहे. त्यातही यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. यामध्ये ७७ प्रकरणे पात्र, ४५ अपात्र तर ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यांची नोंद एक जानेवारी २००१ पासून ठेवण्यात येत असून तेव्हापासून आतापर्यंत तीन हजार २४९ शेतक-यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यापैकी एक हजार ३११ प्रकरणे पात्र, एक हजार ८६३ अपात्र तर अद्याप ७५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आता पोलीस अधिकारी देणार अहवाल शेतकरी आत्महत्या घडल्यानंतर पोलिसांकडे पंचनामा व शवविच्छेदन यापलिकडे फारसा तपास नसायचा. सर्व पडताळणी महसूल विभाग करायचा. त्यानंतर तालुक्यातून जिल्हास्तरावर अहवाल जात असे. जिल्हा समितीची बैठक दोन-तीन महिन्यानंतर व्हायची. एकंदर शेतकरी आत्महत्येनंतर त्या कुटूंबाला मदत मिळायला किमान चार महिने तरी लागायचे. मात्र, शासनाने निर्णय घेऊन  शेतकरी आत्महत्यांचा तपास पोलिसांकडे सोपविला असून  आठवड्याच्या आत अहवाल मागविण्यात येत असल्याने आता वारसांना लगेच मदत मिळणार आहे.

कर्जमाफीच्या काळात वाढल्या आत्महत्याशासनाने जूनच्या शेवटी शेतक-यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, याच कालावधीत यंदा शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात २२, जुलै २५, आॅगस्ट २७ तर २२ सप्टेंबरपर्यंत २० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा जानेवारीत १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४ व मे महिन्यात १७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यामधील ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याGovernmentसरकार