शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाचे७० हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत! आठ निकाल बाकी : निकाल गोंधळ सुरूच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:10 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. तर २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होऊनही राखीव ठेवल्याने त्यांना मिळालेले नाहीत. दुसरीकडे लवकरात लवकर निकाल जाहीर करू, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी जाहीर केले आहे.महिनाभरापासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर आहे. या टीमला मंगळवारी कारभार हाती घेऊन एक महिना झाल्याने कामाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, प्र-कुलगुरू धीरेन पटेल, विशेष अधिकारी विनायक दळवी, उपकुलसचिव दीपक वसावे उपस्थित होते.बीएच्या परीक्षांच्या पेपर तपासणीचे काय?मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल अद्याप जाहीर झाले नसतानाही विद्यापीठाने द्वितीय सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.पण, या परीक्षांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने होणार की नाही, याविषयी अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.बीए पाचव्या सत्राच्या परीक्षा या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २२ नोव्हेंबर, बीएससी पाचव्या सत्राच्या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २७ नोव्हेंबर, तर बीकॉम पाचव्या सत्राच्या २० नोव्हेंबर आणि सहाव्या सत्राच्या परीक्षा या १५ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. पण, आता आॅनलाइन मूल्यांकनासाठी विद्यार्थी संघटना तयार नाहीत. विद्यार्थी संघटनांनी या पद्धतीला कडाडून विरोध केला आहे.लवकरच निकाल जाहीर करणारक्यूआर कोडवरून उत्तरपत्रिका ठेवताना गठ्ठा बदलला गेला किंवा स्कॅनिंग करताना दुसºया ठिकाणी झाला यामुळे उत्तरपत्रिका इतरत्र गेल्या आहेत. पण त्यांचा शोध घेऊन लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत प्रभारी कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले, पदभार स्वीकारला तेव्हा १८० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नव्हते. त्यानंतर गेल्या एका महिन्यात म्हणजे कामाच्या २० दिवसांत तब्बल १७२ निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत आहे. विद्यार्थ्यांवर आलेले दडपण लक्षात घेऊन निकाल आता लवकरात लवकर जाहीरकरण्यात येतील.३५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीआता विद्यापीठाचे एकूण ८ निकाल शिल्लक आहेत. यापैकी ४ निकाल हे नियमित वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे तर, ४ निकाल हे वाणिज्यच्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे आहेत. मुंबई विद्यापीठाच्या १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ६४ हजार ६०४ उत्तरपत्रिकांची तपासणी अन्य विद्यापीठांनी केली आहे. १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ३५ हजार १८८ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.पुनर्मूल्यांकनाचे निकालही लवकरचजाहीर झालेल्या निकालापैकी आतापर्यंत २२ हजार २७५ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत जाहीर केले जातील. बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन २ हजार ६३० परदेशात जाणाºया विद्यार्थ्यांना निकाल दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार