शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पेट्रोलमध्ये जिरणार ७ टक्के इथेनॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:36 AM

महाराष्ट्र अग्रेसर; ८६ कोटी लिटरचा होणार पुरवठा

पुणे : देशात यंदा प्रथमच सात टक्के इथेनॉल पेट्रोलमधे जिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मिती उद्योगांनी देशातील आॅईल कंपन्यांशी तब्बल २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार केला आहे. त्यापैकी ७५ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देखील केला आहे. देशात साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ८६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होईल.

देशाने २०१८ साली बायो फ्युएल पॉलिसी स्वीकारली. त्यानुसार २०३० पर्यंत इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा संकल्प आहे. देशातील इंधनाचा खप लक्षात घेता दहा टक्के इथेनॉल मिश्रण करायचे झाल्यास ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यंदा २३७ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्यात यश आल्यास, ७ टक्के इथेनॉल मिश्रण शक्य होईल, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

राज्यातून ८६ कोटी लिटर इथेनॉलमहाराष्ट्रातून ८६ कोटी इथेनॉलचा पुरवठा होईल. त्यातील ४२ कोटी लिटर इथेनॉलचे राज्यातील इंधानामध्ये मिश्रण होईल. उवर्रित ४४ कोटी इथेनॉल दुसऱ्या राज्यात पाठविले जाईल. डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ९ टक्के इथेनॉलचे मिश्रण झाले झाले आहे.देशभरातून २३७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठ्याचे करार करण्यात आाले असून, त्यातील ४५ कोटी लिटर बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून होईल. १६.५ कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यातून उत्पादित करण्यात येणार आहे. 

कारखान्यांना सुरळीत पत पुरवठा होण्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हवेत. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :Petrolपेट्रोल