शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

प्राध्यापकांच्या रिक्त पदांची सात वर्षांत सहाव्यांदा निघालेली जाहिरात रद्द होणार

By admin | Updated: May 14, 2017 17:05 IST

१ जुलै २०१६ रोजी प्रकाशित झालेली ८९ पदांची जाहिरात रद्द होण्याच्या मार्गावर आ

राम शिनगारे/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 14 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या अनुदानित मंजूर रिक्त पदांचा आकडा शंभरीत पोहोचला आहे. मागील वर्षी १ जुलै २०१६ रोजी प्रकाशित झालेली ८९ पदांची जाहिरात रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या पदांची पुन्हा जाहिरात काढण्याचे स्पष्ट आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळाला नुकतेच दिले. रिक्त पदांची बिंदू नामावली पुन्हा तपासून प्राध्यापक आणि कर्मचा-यांची पुन्हा जाहिरात देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यापीठात मागील वर्षी १ जुलैै रोजी १८ प्रोफेसर, २९ सहयोगी प्राध्यापक आणि ४२ सहायक प्राध्यापक अशा एकूण ८९ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर या पदांसाठी देशभरातून २५०० पेक्षा अधिक पात्र उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. मागील ११ महिन्यात या अर्जांवर साचलेली धुळ झटकलेली नाही. या अर्जांची छाननी तर दुरची गोष्ट आहे. या भरतीमध्ये संधी मिळण्यासाठी अनेकांनी विविध मार्गानी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता सर्वांचाच अपेक्षाभंग होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.  बामुक्टा संघटना आणि पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांविषयी भेट घेतली आहे. यावेळी आमदार चव्हाण यांनी प्राध्यापकांच्या पदभरतीविषयी देण्यात आलेल्या जाहिरातीला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असल्यामुळे सदरील जाहिरात रद्द करत नव्याने पुन्हा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली. नविन प्राधिकरणे ३१ आॅगस्टपर्यंत अस्तित्वात येणार आहेत. तोपर्यंत जाहिरातीद्वारे अर्ज मागवून छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. नविन प्राधिकरणे आल्यानंतर मुलाखत पॅनल तयार करत पदभरती करण्यास कुलगुरूंनी मान्यता दर्शविली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. मागील वर्षीच्या १ जुलै रोजी देण्यात आलेली जाहिरात रद्द झाल्यास १२ मार्च २०१० ते १ जूलैै २०१६ या सात वर्षांच्या कालावधीत तब्बल सहा वेळा जाहिरात देऊन भरती प्रक्रिया विविध कारणांमुळे झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.ज्येष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त होताहेतविद्यापीठ प्रशासनाने मागील वर्षी १ जूलैै रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार प्राध्यापकांच्या ८९ जागा रिक्त होत्या. मात्र यानंतरच्या १० महिन्यात बहुतांश विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत. यात डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. सुधीर गव्हाणे, प्रा. जयदेव डोळे, डॉ. काशिनाथ रणवीर, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. माधवराव सोनटक्के, डॉ. एस.पी.झांबरे, डॉ. बजाज आदी प्राध्यापक सेवानिवृत्त झाले. याशिवाय डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. एस. टी. सांगळे हे महाविद्यालयात गेले आहेत.डॉ. मेबल फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. तसेच येत्या एक -दोन महिन्यात डॉ. सतीश बडवे, डॉ. विनायक भिसे यांच्यासह अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे हा आकडा शंभरीच्याही पुढे जात आहे. अशा आल्या जाहिरातीविद्यापीठात मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीसाठी पहिली जाहिरात १२ मार्च २०१० रोजी काढण्यात आली. यानंतर कोर्टाच्या आदेशामुळे हीच जाहिरात २५ मार्च २०१० रोजी शुध्दीपत्रकाने काढण्यात आली. मात्र पदे काही भरण्यात आली नाहीत. तीसरी जाहिरात ११ आॅगस्ट २०१२ रोजी निघाली. चौथी व पाचवी जाहिरात २८ नोव्हेंबर २०१३ (विज्ञान व सामाजिकशास्त्रे यांची वेगवेगळी) आणि सहावी जाहिरात १ जूलै २०१६ रोजी काढण्यात आली आहे. सर्व जाहिरातीमध्ये एकदाही पदभरती करण्यात आली नाही. यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आकडा शंभरी पार गेला आहे. आता सातव्यांदा याच पदासाठी पुढील दोन महिन्यात जाहिरात काढण्याच्या हालचाली सुरु होणार आहेत. या सर्व दिरंगाईमुळे अनेक विभागामध्ये एक, दोन प्राध्यापकच उरले आहेत. याचा परिणाम विद्यापीठाच्या संशोधन, गुणवत्तेवर होत आहे.