शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

‘वंचित’च्या ६.५ टक्के मतांचा आघाडी, युतीलाही फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 06:05 IST

काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचा ३ जागांवर पराभव

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विजयावर पाणी फेरले. वंचितच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांमुळे काँग्रेसच्या चार, राष्ट्रवादीच्या तीन तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयापासून ‘वंचित’ रहावे लागले. तर शिवसेनेला दोन आणि भाजपाला एका जागी पराभव पत्करावा लागला. राज्यातील ४८ जागांवर वंचितने उमेदवार उभे केले होते. त्यांना ४१ लाख ३९ हजार मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण झालेल्या मतदानाच्या साडेसहा टक्के आहेत.

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वंचितचा चांगलाच फटका बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,६६,१९६ मते मिळवली. येथे अशोक चव्हाण यांचा ४०,१४८ मतांनी पराभव झाला. उस्मानाबादेत ‘वंचित’ने ९८,५७९ मते मिळवली पण येथे नोटाची मते १०,०२४ होती. येथे राष्टÑवादीचे जनजीतसिंह राणा यांचा १,२७,५६६ मतांनी पराभव झाला.मराठवाड्यात परभणीमध्ये राष्ट्रवादीला वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,४९,९४६ मते मिळवली. तर राष्टÑवादीच्या राजेश विटेकर यांचा ४२,१९९ मतांनी पराभव झाला.

माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा १,५८,६०८ मतांनी पराभव झाला व येथे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ मते मिळाली.अमरावती येथे वंचितच्या उमेदवाराने ६५,१३५ मते मिळवली आणि तेथे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ ३६,९५१ मतांनी पराभूत झाले. औरंगाबादेतही वंचित आघाडी सोबत असणाऱ्या एमआयएमने ३,८९,०४२ मते मिळवली व तेथे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. बीडमध्ये ‘वंचित’ने ९२,१३९ मते मिळवली पण वंचित व इतरांची मते एकत्र केली तरीही प्रीतम मुंडे यांचे मताधिक्य कमी झाले नसते. बुलडाण्यात ‘वंचित’ने १,७२,६२७ मते मिळवली. येथे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे १,३३,२८७ मतांनी पराभूत झाले.चंद्रपूरमध्ये ‘वंचित’चा फटका भाजपला बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,१२,०७९ मते मिळवली. येथे भाजपाचे माजी मंत्री हंसराज अहिर यांचा ४४,७६३ मतांनी पराभव झाला आहे. त्या उलट गडचिरोली चिमूर येथे काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यांना वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,११,४६८ मते मिळवली आणि उसेंडी यांचा ७७,५२६ मतांनी पराभव झाला आहे.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाआघाडीत दोन जागा लढवल्या होत्या. मात्र दोन्ही जागा ‘वंचित’मुळे त्यांना गमवाव्या लागल्या. हातकणंगले येथे वंचितच्या उमेदवारास १,२३,४१९ मते मिळाली. आणि राजू शेट्टी यांचा पराभव ९६,०३९ मतांनी झाला. हीच अवस्था सांगलीत झाली. येथे वंचितच्या उमेदवाराने तब्बल ३,००,२३४ मते मिळवली. येथे विशाल पाटील यांचा १,६४,३५२ मतांनी पराभव झाला. हिंगोलीत वंचितच्या उमेदवारास १,७४,०५१ मते मिळाली पण येथे शिवसेनेच्या उमेदवाराने २ लाख ७७ हजार मतांपेक्षा जास्तीची आघाडी घेतली होती. अशीच परिस्थिती लातूरमध्येही झाली. मुंबईत वंचितच्या उमेदवारांनी मते मिळवली पण कोठेही त्यांच्यामुळे अन्य उमेदवाराचा पराभव झाला नाही.अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सांगली व सोलापूरात ‘वंचित’ने एक लाख ते अडीच लाखाच्या घरात मते मिळवली आहेत तर १६ लोकसभा मतदार संघात ५० हजार ते ९९ हजारांच्या आत मते मिळवली आहेत. त्यामुळे वंचितने अनेकांना सत्तेपासून वंचित ठेवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असा आरोपही झाला पण त्यांनी भाजप शिवसेनेच्या तीन जागाही पराभूत केल्या आहेत.

आंबेडकर यांना २,७८,८४८ मतेअकोल्यात वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २,७८,८४८ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला २,५४,३७० मते मिळाली. या दोघांच्या मतांची बेरीज ५,३३,२२१८ होते. ही जागा काँग्रेसने आंबेडकरांसाठी सोडली असती तरीही त्यांना विजयासाठी २१,२२६ मते कमी पडली असती. कारण येथे भाजपला ५,५४,४४४ मते मिळाली आहेत. तर अन्य उमेदवारांंना ३१,७७८ मतं आहेत.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९