शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘वंचित’च्या ६.५ टक्के मतांचा आघाडी, युतीलाही फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 06:05 IST

काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचा ३ जागांवर पराभव

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विजयावर पाणी फेरले. वंचितच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांमुळे काँग्रेसच्या चार, राष्ट्रवादीच्या तीन तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयापासून ‘वंचित’ रहावे लागले. तर शिवसेनेला दोन आणि भाजपाला एका जागी पराभव पत्करावा लागला. राज्यातील ४८ जागांवर वंचितने उमेदवार उभे केले होते. त्यांना ४१ लाख ३९ हजार मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण झालेल्या मतदानाच्या साडेसहा टक्के आहेत.

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वंचितचा चांगलाच फटका बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,६६,१९६ मते मिळवली. येथे अशोक चव्हाण यांचा ४०,१४८ मतांनी पराभव झाला. उस्मानाबादेत ‘वंचित’ने ९८,५७९ मते मिळवली पण येथे नोटाची मते १०,०२४ होती. येथे राष्टÑवादीचे जनजीतसिंह राणा यांचा १,२७,५६६ मतांनी पराभव झाला.मराठवाड्यात परभणीमध्ये राष्ट्रवादीला वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,४९,९४६ मते मिळवली. तर राष्टÑवादीच्या राजेश विटेकर यांचा ४२,१९९ मतांनी पराभव झाला.

माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा १,५८,६०८ मतांनी पराभव झाला व येथे ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ मते मिळाली.अमरावती येथे वंचितच्या उमेदवाराने ६५,१३५ मते मिळवली आणि तेथे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ ३६,९५१ मतांनी पराभूत झाले. औरंगाबादेतही वंचित आघाडी सोबत असणाऱ्या एमआयएमने ३,८९,०४२ मते मिळवली व तेथे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. बीडमध्ये ‘वंचित’ने ९२,१३९ मते मिळवली पण वंचित व इतरांची मते एकत्र केली तरीही प्रीतम मुंडे यांचे मताधिक्य कमी झाले नसते. बुलडाण्यात ‘वंचित’ने १,७२,६२७ मते मिळवली. येथे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे १,३३,२८७ मतांनी पराभूत झाले.चंद्रपूरमध्ये ‘वंचित’चा फटका भाजपला बसला. येथे वंचितच्या उमेदवाराने १,१२,०७९ मते मिळवली. येथे भाजपाचे माजी मंत्री हंसराज अहिर यांचा ४४,७६३ मतांनी पराभव झाला आहे. त्या उलट गडचिरोली चिमूर येथे काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यांना वंचितचा फटका बसला. येथे ‘वंचित’ने १,११,४६८ मते मिळवली आणि उसेंडी यांचा ७७,५२६ मतांनी पराभव झाला आहे.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाआघाडीत दोन जागा लढवल्या होत्या. मात्र दोन्ही जागा ‘वंचित’मुळे त्यांना गमवाव्या लागल्या. हातकणंगले येथे वंचितच्या उमेदवारास १,२३,४१९ मते मिळाली. आणि राजू शेट्टी यांचा पराभव ९६,०३९ मतांनी झाला. हीच अवस्था सांगलीत झाली. येथे वंचितच्या उमेदवाराने तब्बल ३,००,२३४ मते मिळवली. येथे विशाल पाटील यांचा १,६४,३५२ मतांनी पराभव झाला. हिंगोलीत वंचितच्या उमेदवारास १,७४,०५१ मते मिळाली पण येथे शिवसेनेच्या उमेदवाराने २ लाख ७७ हजार मतांपेक्षा जास्तीची आघाडी घेतली होती. अशीच परिस्थिती लातूरमध्येही झाली. मुंबईत वंचितच्या उमेदवारांनी मते मिळवली पण कोठेही त्यांच्यामुळे अन्य उमेदवाराचा पराभव झाला नाही.अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सांगली व सोलापूरात ‘वंचित’ने एक लाख ते अडीच लाखाच्या घरात मते मिळवली आहेत तर १६ लोकसभा मतदार संघात ५० हजार ते ९९ हजारांच्या आत मते मिळवली आहेत. त्यामुळे वंचितने अनेकांना सत्तेपासून वंचित ठेवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असा आरोपही झाला पण त्यांनी भाजप शिवसेनेच्या तीन जागाही पराभूत केल्या आहेत.

आंबेडकर यांना २,७८,८४८ मतेअकोल्यात वंचित आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २,७८,८४८ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला २,५४,३७० मते मिळाली. या दोघांच्या मतांची बेरीज ५,३३,२२१८ होते. ही जागा काँग्रेसने आंबेडकरांसाठी सोडली असती तरीही त्यांना विजयासाठी २१,२२६ मते कमी पडली असती. कारण येथे भाजपला ५,५४,४४४ मते मिळाली आहेत. तर अन्य उमेदवारांंना ३१,७७८ मतं आहेत.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९