दोन महिन्यांमध्ये 61 मातांचा मृत्यू
By Admin | Updated: July 10, 2014 00:34 IST2014-07-10T00:34:20+5:302014-07-10T00:34:20+5:30
प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे.

दोन महिन्यांमध्ये 61 मातांचा मृत्यू
पूजा दामले - मुंबई
प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे. मात्र तरीही मुंबईसारख्या शहरामध्ये माता मृत्यूचा आकडा वाढता आहे. एप्रिल आणि मे 2क्14 या दोन महिन्यांच्या दरम्यान एकूण 61 मातांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
एप्रिल आणि मे 2क्13 या दोन महिन्यांमध्ये एकूण 31 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. एका वर्षानंतर एप्रिल आणि मे 2क्14 या दोन महिन्यांमध्ये 61 मातांचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. यामध्ये 26 माता या मुंबईतील तर उर्वरित 35 माता या मुंबईबाहेरील असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये माता मृत्युदराचा आकडा हा मुंबई शहरामध्ये चढाच पाहायला मिळालेला आहे. 2क्क्9-1क् या वर्षात मुंबईमध्ये एकूण 2क्6 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये 125 माता या मुंबईतील होत्या, तर 81 माता या मुंबईबाहेरून मुंबईमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या होत्या. 2क्13-14 या एका वर्षात माता मृत्यूचा आकडा 276 वर पोहोचलेला आहे. यामध्ये 126 माता या मुंबईतील तर 15क् माता या मुंबईबाहेरील होत्या. 2क्12-13 या वर्षामध्ये तब्बल 278 मातांचा मृत्यू झाला होता. गेल्या पाच वर्षामध्ये या वर्षी सर्वाधिक मातांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलेली आहे.
मुंबईत पालिकेची तीन मुख्य रुग्णालये आहेत. यामुळे मुंबईजवळील कोणत्याही रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत झाल्यास त्या महिलेला मुंबईच्या रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे मुंबईतील माता मृत्यूच्या संख्येत मुंबईबाहेरील मातांच्या आकडेवारीचाही समावेश आहे, असे आरोग्य विभागाच्या एका अधिका:याने सांगितले. गर्भारपणामध्ये काय काळजी घ्यावी, याविषयी आता जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षापूर्वीर्पयत गर्भवती महिलांच्या नोंदणीचे प्रमाण कमी होते. आता हे प्रमाण वाढले आहे. माता मृत्यू टाळण्यासाठी काही गोष्टी होणो गरजेचे आहे.
यामध्ये पहिल्यांदा महिलेच्या नावाची नोंदणी करणो अत्यावश्यक आहे. एका गर्भारपणामध्ये किमान चार वेळा त्या महिलेच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. 12 आठवडय़ांत पहिली तपासणी झाली पाहिजे. या वेळी तिच्या रक्ताची, लघवीची तपासणी झाली पाहिजे. एकदा तरी सोनोग्राफी झाली पाहिजे. गर्भवती महिलेचा आहार सकस असला पाहिजे. दुपारी किमान 2 तास झोपले पाहिजे आणि रात्री सहा तासांची झोप मिळाली पाहिजे, असा सल्ला कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिला.
मृत्यूची कारणो
च्प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्रव होणो
च्जंतूसंसर्गाची लागण होणो
च्अॅनिमिया (रक्तक्षय) होणो
च्प्रसूतीदरम्यान सकस आहार न घेतल्याने माता कुपोषित राहणो
बाहेरील रुग्ण
मुंबईत पालिकेची तीन मुख्य रुग्णालये आहेत. यामुळे मुंबईजवळील रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत झाल्यास त्या महिलेला मुंबईच्या रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे मुंबईतील माता मृत्यूच्या संख्येत मुंबईबाहेरील मातांच्या आकडेवारीचाही समावेश आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.