शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी - मंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: July 19, 2024 14:48 IST

पाली बसस्थानकाचे लोकार्पण उत्साहात

रत्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. राज्य सरकार राबवत असलेल्या असंख्य लोकोपयोगी योजनांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी केली.मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग यावरील पाली हे एकमेव बसस्थानक आहे. भविष्यात अधिक महत्त्व येणार असल्याने हे स्थानक नव्याने बांधण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रण प्रश्रेश बोरसे, कार्यकारी अभियंता मीनल सोनावणे, पंचायत समितीचे माजी सभापती महेश तथा बाबू म्हाप, गोकुळ दूधचे संचालक मुरलीधर जाधव, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, संतोष सावंतदेसाई यांच्यासह अनेक अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खाते आहे. बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून निधी देण्याची सूचना त्यांनी आपल्याला केली. राज्यात १९३ बसस्थानकांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाली बसस्थानकासाठी ३ कोटी ९२ लाख रुपये खर्च आला असून, जिल्ह्यातील अन्य स्थानिकांना ८० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सर्व स्थानकांची कामे सुरू असून, त्यात सर्वात प्रथम आपल्या गावातील बसस्थानकच पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यासाठी आपण ५० नियमित आणि ५० मिनी बस मंजूर केल्या आहेत. पण फक्त इमारती उभ्या करुन चालत नाहीत. त्याची देखभालही करावी लागते. स्थानकांवरील सर्व सुविधा नियमित आहेत की नाहीत, त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.पाली राज्यात आदर्श गाव बनवणारपाली स्थानकावर महिलांसाठी वातानुकूलीत हिरकणी कक्ष बनवण्यात आला आहे. पालीमध्येच आपण महिला बचत गटांसाठी वातानुकूलीत सभागृह तयार करत आहाेत. पालीतील तरुणांनी सवलतीचे व्यावसायिक कर्ज घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन करतानाच त्यांनी पाली हे राज्यात आदर्श गाव ठरेल, अशा पद्धतीने योजना राबवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत