शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 7:21 AM

बीडमध्ये सर्वाधिक तर पुणे मतदारसंघात सर्वात कमी मतदान.

मुंबई : लोकसभा  निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी राज्यात ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता शांततेत  मतदान झाले. रात्री साडे अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले आहे. यावेळीदेखील तुलनेने मतदानाचा टक्का वाढवण्यात यंत्रणांना अपयश आल्याचेच दिसून येते.  सर्वाधिक मतदान बीड मतदारसंघात ६९.७४ टक्के एवढे झाले तर सर्वांत कमी मतदान पुणे मतदारसंघात ५१.२५ टक्के झाले.

चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे, तसेच पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, सुजय विखे यांच्यासह २९८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.  औरंगाबादसह पुणे व मावळ मतदारसंघात झालेल्या वादळी पावसाचा फटका मतदानाला बसल्याचे दिसले. पुण्यात विशेष करून मतदानाची वेळ संपत आली की, मतदारांच्या रांगा लागत असतात. मात्र, साेमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आणि मतदानासाठी उशिरापर्यंत लागणाऱ्या रांगा कमी झाल्याचे दिसले.  

सुजय विखे करू शकले नाहीत स्वत:ला मतदान

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे स्वत:ला मतदान करू शकले नाहीत. विखे पाटील परिवाराने त्यांचे मूळ गाव लोणी (ता. राहाता) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. लोणी हे गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे स्वत:ला मतदान ते करू शकले नाहीत. 

मतदान कर्मचाऱ्यांकडेच विखे पाटील यांची प्रचार पत्रके 

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराची पत्रके मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे आढळून आली. ग्रामस्थांनी त्याला आक्षेप घेतला. मतदान केंद्रावर यावेळी बराच गोंधळ झाला. मतदान केंद्रावरील अधिकारी हे विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिली. बाहेरच्या व्यक्तीने पत्रक टाकल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार लक्षात घेऊन केंद्रावरील कर्मचाऱ्यांची टीम तत्काळ बदलण्यात आली. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.  

तृतीयपंथीयांचे १०० टक्के मतदान

अहमदनगर : इतर सर्वसामान्य महिला-पुरुषांसारखेच आम्हीही रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. यातून आमचे अस्तित्व अधोरेखित झाले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहोत याचे समाधान वाटले, अशा शब्दांत येथील तृतीयपंथीयांनी मतदान केल्यानंतर आपली भावना व्यक्त केली. नगर शहरात १२० तृतीयपंथी आहेत. त्या सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

भौगोलिक कोंडीमुळे भुमरे करू शकले नाहीत स्वतःला मतदान 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा  मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचे मतदान जालना लोकसभा मतदारसंघातील पाचोड येथील मतदान केंद्रावर असल्याने त्यांना स्वतःला मतदान करता आले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे तालुके जालना मतदारसंघात येतात. या भौगोलिक कोंडीमुळे भुमरे यांना स्वतःऐवजी जालना मतदारसंघासाठी मतदान करावे लागले.  

मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याचा मृत्यू 

जळगाव : मतदान केंद्रावर असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन संजय भगवान चौधरी (५३, रा.जोशी पेठ, जळगाव) या मनपा कर्मचाऱ्याचा रात्री दीड वाजता मृत्यू झाला. चाळीसगाव शहरातील तेहजीब उर्दू प्रायमरी स्कूल केंद्र क्रमांक १९१ या ठिकाणी त्यांना ड्युटी देण्यात आली होती.

वार्तांकन करताना पत्रकाराचा मृत्यू

अंबाजोगाई : निवडणुकीचे वार्तांकन करताना टीव्ही पत्रकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. ठाणे येथील वैभव कनघुटकर (४५) वार्तांकन करण्यासाठी शहरात आले होते.  

मतदान कार्ड आहे, पण यादीत मात्र नाव नाही 

जालना : जालना मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास २० केंद्रांवरील मशीन बदलण्यात आली; तर मतदान कार्ड आहे, परंतु मतदार यादीत नाव नसल्याने जालना शहरातील शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. 

औरंगाबाद मतदारसंघात शांततेत मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. दुपारनंतर मतदानाचा टक्का घसरला. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी होत्या. 

साठवण तलावासाठी मतदानावर बहिष्कार

बीड : उन्हाचा पारा असूनही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. काही ठिकाणचे किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांतता होती. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला होता.  

काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावर बोगस मतदान

पुणे : पुणे मतदारसंघातील सेंट मीराज स्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिंदे यांनी मतदान अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चॅलेंज व्होट, फॉर्म भरला, ११७ बी  नुसार मतदान केले. शिंदे म्हणाले की, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचे आढळले. यासंदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर चॅलेंज व्होट, टेंडर व्होट फॉर्म भरून मतदान केले आहे.

जिवंत मतदार झाले मृत 

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ मध्ये जिवंत मतदारांची नोंद मृत असा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मतदान केंद्रातील मतदार असलेल्या पाचजणांची नाेंद मृत अशी आढळली. यात नजीर करीम शेख, राजा मोहन गावंडे, हसन शेखलाल शेख, विजय तुकाराम कोंढरे, फकीर अहमद शेख या मतदारांचासमावेश आहे.

दोन माजी सरपंचांसह चौघांना दाखविले मयत

जळगाव : वडली गावातील मतदार यादीत गोकुळ गजमल पाटील व सत्यभामा अशोक पाटील या माजी सरपंचांसह त्र्यंबक श्यामराव पाटील व जितेंद्र एकनाथ पाटील या चार जिवंत व्यक्तींना मयत दाखविण्यात आले. त्याशिवाय मयत झालेल्यांची नावे कायम होती. नावनोंदणी करूनही अनेक नवमतदारांची नावेच समाविष्ट झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

अकरा मतदारसंघांतील मतदान

नंदुरबार२०१४    ६६.७७%२०१९    ६८.६५%२०२४    ६७.१२%

जळगाव२०१४    ५८.००%२०१९    ५६.५५%२०२४    ५३.६५%

रावेर२०१४    ६३.४८%२०१९    ६१.७७%२०२४    ६१.३६%

जालना २०१४    ६६.१५%२०१९    ६४.७५%२०२४    ६८.३०%

औरंगाबाद२०१४    ६१.८५%२०१९     ६३.५५%२०२४    ६०.७३%

मावळ२०१४    ६०.११%२०१९    ५९.५९%२०२४     ५२.९०%

पुणे २०१४    ५४.१४%२०१९    ४९.८९%२०२४    ५१.२५%

शिरूर२०१४    ५९.७३%२०१९    ५९.४४%२०२४    ५१.४६%

अहमदनगर२०१४    ६२.३३%२०१९    ६४.७९%२०२४    ६२.७६%

शिर्डी २०१४    ६३.८०%२०१९    ६४.९३%२०२४    ६१.१३%

बीड२०१४    ६८.७५%२०१९    ६६.१७%२०२४    ६९.७४% 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४