शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

राज्यातील ५६ टक्के बालके, महिला रक्तक्षयामुळे त्रस्त; राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:49 IST

National Family Survey : देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते.

  - बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा केली आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ५६ टक्के बालके, गराेदर माता आणि महिला रक्तक्षयाने (ॲनिमिया) त्रस्त आहेत. ही धक्कादायक बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणाच्या (एएफएचएस-५) अहवालातून उजेडात आली आहे. 

देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते. या सर्वेक्षणातून राज्यातील ६ ते ५९ महिन्यांच्या आतील बालके, १५ ते ५९ वयाेगटातील महिला आणि गराेदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सरासरी ५०.३ टक्के एवढे हाेते. मात्र, आता हेच प्रमाण थेट ५६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा आणि जिल्हास्तरीय यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालके यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ६८.९ टक्क्यांवरबालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ५३.८ टक्के एवढे हाेते. यामध्ये वाढ हाेऊन ते ६८.९ टक्क्यांवर गेले आहे. महिलांतील रक्तक्षयाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून थेट ५४.५ टक्के एवढे झाले आहे. गराेदर मातांतील  रक्तक्षयाचे प्रमाण काहीअंशी खाली आले असले तरी फारसे समाधानकारक नाही. चार वर्षांपूर्वी ४९.३ टक्के गराेदर माता रक्तक्षयाने त्रस्त हाेत्या. तर ताज्या अहवालानुसार ४५.७ टक्के मातांमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. 

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र...रक्तक्षय    एनएफएचएस-४    एनएफएचएस-५बालके           ५३.८    ६८.९ टक्केमहिला     ४७    ५४.५ टक्केगराेदर माता    ४९.३    ४५.७ टक्के

असे हाेतात दुष्परिणामलहान मुले : कुपाेषण वाढीस लागून वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे, खेळण्याची क्रियाशीलता कमी हाेणे, अभ्यासावरील लक्ष कमी हाेणे, वारंवार थकवा येणे, बालमृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता असते.गराेदर माता : रक्तक्षयाचे प्रमाण वाढल्यास गर्भपात हाेणे, कमी दिवसांची प्रसूती, गर्भारपणात रक्तदाब वाढणे, वारंवार जंतुसंसर्ग हाेणे, प्रसूतिदरम्यान रक्तस्राव हाेणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपण व बाळंतपणानंतर अन्य आजारांची लागण हाेते. यातूनच माता मृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता बळावते. 

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र