शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

राज्यातील ५६ टक्के बालके, महिला रक्तक्षयामुळे त्रस्त; राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:49 IST

National Family Survey : देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते.

  - बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा केली आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ५६ टक्के बालके, गराेदर माता आणि महिला रक्तक्षयाने (ॲनिमिया) त्रस्त आहेत. ही धक्कादायक बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणाच्या (एएफएचएस-५) अहवालातून उजेडात आली आहे. 

देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते. या सर्वेक्षणातून राज्यातील ६ ते ५९ महिन्यांच्या आतील बालके, १५ ते ५९ वयाेगटातील महिला आणि गराेदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सरासरी ५०.३ टक्के एवढे हाेते. मात्र, आता हेच प्रमाण थेट ५६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा आणि जिल्हास्तरीय यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालके यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ६८.९ टक्क्यांवरबालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ५३.८ टक्के एवढे हाेते. यामध्ये वाढ हाेऊन ते ६८.९ टक्क्यांवर गेले आहे. महिलांतील रक्तक्षयाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून थेट ५४.५ टक्के एवढे झाले आहे. गराेदर मातांतील  रक्तक्षयाचे प्रमाण काहीअंशी खाली आले असले तरी फारसे समाधानकारक नाही. चार वर्षांपूर्वी ४९.३ टक्के गराेदर माता रक्तक्षयाने त्रस्त हाेत्या. तर ताज्या अहवालानुसार ४५.७ टक्के मातांमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. 

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र...रक्तक्षय    एनएफएचएस-४    एनएफएचएस-५बालके           ५३.८    ६८.९ टक्केमहिला     ४७    ५४.५ टक्केगराेदर माता    ४९.३    ४५.७ टक्के

असे हाेतात दुष्परिणामलहान मुले : कुपाेषण वाढीस लागून वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे, खेळण्याची क्रियाशीलता कमी हाेणे, अभ्यासावरील लक्ष कमी हाेणे, वारंवार थकवा येणे, बालमृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता असते.गराेदर माता : रक्तक्षयाचे प्रमाण वाढल्यास गर्भपात हाेणे, कमी दिवसांची प्रसूती, गर्भारपणात रक्तदाब वाढणे, वारंवार जंतुसंसर्ग हाेणे, प्रसूतिदरम्यान रक्तस्राव हाेणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपण व बाळंतपणानंतर अन्य आजारांची लागण हाेते. यातूनच माता मृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता बळावते. 

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र