शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

राज्यातील ५६ टक्के बालके, महिला रक्तक्षयामुळे त्रस्त; राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:49 IST

National Family Survey : देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते.

  - बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा केली आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ५६ टक्के बालके, गराेदर माता आणि महिला रक्तक्षयाने (ॲनिमिया) त्रस्त आहेत. ही धक्कादायक बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणाच्या (एएफएचएस-५) अहवालातून उजेडात आली आहे. 

देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते. या सर्वेक्षणातून राज्यातील ६ ते ५९ महिन्यांच्या आतील बालके, १५ ते ५९ वयाेगटातील महिला आणि गराेदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सरासरी ५०.३ टक्के एवढे हाेते. मात्र, आता हेच प्रमाण थेट ५६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा आणि जिल्हास्तरीय यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालके यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ६८.९ टक्क्यांवरबालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ५३.८ टक्के एवढे हाेते. यामध्ये वाढ हाेऊन ते ६८.९ टक्क्यांवर गेले आहे. महिलांतील रक्तक्षयाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून थेट ५४.५ टक्के एवढे झाले आहे. गराेदर मातांतील  रक्तक्षयाचे प्रमाण काहीअंशी खाली आले असले तरी फारसे समाधानकारक नाही. चार वर्षांपूर्वी ४९.३ टक्के गराेदर माता रक्तक्षयाने त्रस्त हाेत्या. तर ताज्या अहवालानुसार ४५.७ टक्के मातांमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. 

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र...रक्तक्षय    एनएफएचएस-४    एनएफएचएस-५बालके           ५३.८    ६८.९ टक्केमहिला     ४७    ५४.५ टक्केगराेदर माता    ४९.३    ४५.७ टक्के

असे हाेतात दुष्परिणामलहान मुले : कुपाेषण वाढीस लागून वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे, खेळण्याची क्रियाशीलता कमी हाेणे, अभ्यासावरील लक्ष कमी हाेणे, वारंवार थकवा येणे, बालमृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता असते.गराेदर माता : रक्तक्षयाचे प्रमाण वाढल्यास गर्भपात हाेणे, कमी दिवसांची प्रसूती, गर्भारपणात रक्तदाब वाढणे, वारंवार जंतुसंसर्ग हाेणे, प्रसूतिदरम्यान रक्तस्राव हाेणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपण व बाळंतपणानंतर अन्य आजारांची लागण हाेते. यातूनच माता मृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता बळावते. 

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र