शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

राज्यात पाचव्या टप्प्यात 56.89 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:37 IST

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात सोमवारी झालेल्या मतदानात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती रात्री उशिराने निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात एकूण ६६.७५ टक्के तर सर्वात कमी मतदान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के झाले आहे. विधानसभानिहाय मतदारसंघात पाचव्या टप्प्यात दिंडोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार १३ मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात ६६.७५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या १३ मतदारसंघातील जवळपास चार मतदारसंघात ६० आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का पोहोचला आहे. कल्याण मतदारसंघात ५०.१२ टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सर्वात जास्त मतदान दिंडोरी विधानसभेत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.४२ टक्के मतदान झाली आहे. या आकडेवारीनुसार एकूण ८ विधानसभा मतदारसंघांत ७० आणि ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यात भिवंडी ग्रामीण ७२,६६ टक्के, डहाणू ७३.७५ टक्के, इगतपुरी ७२.२४ टक्के, कळवण ७०.८९ टक्के, पालघर ७०.३४ टक्के, शहापूर ७०२६ टक्के आणि विक्रमगड ७४.४५ टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

... येथे ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानसर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहे. कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. या आठ मतदारसंघांत ऐरोली ४८.४७ टक्के, अंबरनाथ ४७.०७ टक्के, भिवंडी पूर्व ४९.८७ टक्के, चांदिवली ४९.४३ टक्के, कुलाबा ४३.६८ टक्के, धारावी ४८.५२ टक्के, मिरा भाईंदर ४८.९५ टक्के आणि मुंब्रा कळवा ४८.७२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024