शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाचव्या टप्प्यात 56.89 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:37 IST

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात सोमवारी झालेल्या मतदानात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती रात्री उशिराने निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात एकूण ६६.७५ टक्के तर सर्वात कमी मतदान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के झाले आहे. विधानसभानिहाय मतदारसंघात पाचव्या टप्प्यात दिंडोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार १३ मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात ६६.७५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या १३ मतदारसंघातील जवळपास चार मतदारसंघात ६० आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का पोहोचला आहे. कल्याण मतदारसंघात ५०.१२ टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सर्वात जास्त मतदान दिंडोरी विधानसभेत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.४२ टक्के मतदान झाली आहे. या आकडेवारीनुसार एकूण ८ विधानसभा मतदारसंघांत ७० आणि ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यात भिवंडी ग्रामीण ७२,६६ टक्के, डहाणू ७३.७५ टक्के, इगतपुरी ७२.२४ टक्के, कळवण ७०.८९ टक्के, पालघर ७०.३४ टक्के, शहापूर ७०२६ टक्के आणि विक्रमगड ७४.४५ टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

... येथे ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानसर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहे. कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. या आठ मतदारसंघांत ऐरोली ४८.४७ टक्के, अंबरनाथ ४७.०७ टक्के, भिवंडी पूर्व ४९.८७ टक्के, चांदिवली ४९.४३ टक्के, कुलाबा ४३.६८ टक्के, धारावी ४८.५२ टक्के, मिरा भाईंदर ४८.९५ टक्के आणि मुंब्रा कळवा ४८.७२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024