शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

जुलैतील अतिवृष्टीग्रस्तांना 554 कोटींचा दिलासा; सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला, सर्वात कमी जळगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:16 IST

या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे.

नारायण जाधव - 

ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका संपूर्ण राज्याला बसला होता. शेतपिकांच्या नुकसानीसह घरे, दारे, गुरे, ढोरे, गोठे यांच्या नुकसानासह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अखेर दोन महिन्यांनी का होईना महाविकास आघाडी सरकारने या अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजाराचा पहिला हप्ता गुरुवारी वितरित केला. या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे. विभागवार विचार करता सर्वाधिक रक्कम पुणे आणि कोकण विभागास तर सर्वात कमी नाशिक विभागास दिली आहे. यात जळगावच्या हातात तर अवघे ४० हजार टिकवले आहेत.कोकणातील ठाणे जिल्ह्याला ४२ कोटी ९० लाख ९४ हजार तर पालघर जिल्ह्याला दोन कोटी ६८ लाख ४४ हजार अशी ४५ कोटी ५९ लाख ३८ हजार, रायगडला ६० कोटी ४१ लाख ३६ हजार, रत्नागिरीला ४४ कोटी २९ लाख १७ आणि सिंधुदुर्गास सहा कोटी ९४ लाख ४५ हजार रुपयांची मदत दिली आहे.जुलैत कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांचे संसार वाहून गेले होते. या सर्वांना महाविकास आघाडी सरकारकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा होती.

विभागवार मदत व रक्कमपुणे विभाग : ३१६ कोटी ३८ लाख ४९ हजारकोकण विभाग : १५७ कोटी ७१ लाख ९९ हजारअमरावती विभाग : ६७ कोटी २४ लाख १८ हजारनागपूर विभाग :  १० कोटी ४८ लाख ४० हजारमराठवाडा विभाग : ३ काेटी ३ लाख ७ हजारनाशिक विभाग : १ लाख ४० रुपये 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा