शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वास्तव! महाराष्ट्रातील ५५ टक्के खेडी इंटरनेटविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:56 IST

देशात ४.५० लाख खेड्यांत नाही ऑप्टिकल फायबर. धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील सहा लाख खेडी आणि पंचायतींना ऑगस्ट २०२१ अखेर ऑप्टिकल फायबरने जोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार होण्याची चिन्हे नाहीत. यावर्षी जुलैपर्यंत ५.९८ लाख खेड्यांपैकी फक्त १.५० लाख ग्रामपंचायती भारत नेट प्रोजेक्टअंतर्गत जोडल्या गेल्या होत्या व ती टक्केवारी आहे सुमारे २५.

धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही. अधिकृत सूत्रांकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात २०१४ खेड्यांत थ्री जी, फोर जी मोबाईल टेलिफोन सेवा नाही आणि ४०,९५९ (५५ टक्के) खेड्यांत इंटरनेट सेवा नाही. इंटरनेट फक्त १९,०१३ खेड्यांत उपलब्ध आहे. सहा लाख खेड्यांपैकी फक्त ३० टक्के खेड्यांत इंटरनेट उपलब्ध आहे आणि अशा खेड्यांत राहणाऱ्या मुलांना विकसित खेड्यांतील मुलांच्या तुलनेत रिमोट एज्युकेशन फॅसिलिटीज नाहीत.

बिहारमधील ३९,०७३ खेड्यांपैकी ८,१६३ खेड्यांत इंटरनेट सेवा आहे. थ्री जी, फोर जी नेटवर्क सुविधेपक्षा ही परिस्थिती खूप चांगली आहे. फक्त ३२१ खेड्यांत फोर जी सेवा नाही. उत्तर प्रदेशमधील ९७,८१३ खेड्यांपैकी ६२० खेड्यांत ही सेवा नाही; पण इंटरनेटचा विचार केला तर उत्तर प्रदेशात अशी सेवा फक्त ३० टक्के आहे.देशात पंजाबमध्ये इंटरनेटची सेवा १०० टक्के आहे. तेथे १२,६६० खेड्यांत इंटरनेटची पूर्ण सेवा आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत या खेड्यांची संख्या १२,१६८ होती. 

हरयाणात इंटरनेची सेवा ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपलब्ध आहे. थ्री जी, फोर जी सेवा राज्यातील १०० टक्के खेड्यांत उपलब्ध आहे. केरळमध्ये इंटरनेटची सेवा ९५ टक्के खेड्यांत आहे.

आता ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान मोदी यांनी आता हे लक्ष्य गाठण्यासाठी ऑगस्ट २०२३ निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडला अपयश आल्यामुळे मोदी यांनी खासगी सेवादारांकडून निविदा मागवून पीपीपी मॉडेलचा आधार घेतला आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र