शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:16 IST

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या.

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या. कुठे काट्याची लढत झाली, तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले. महाराष्ट्रातील अशी शेवटची थेट लढत १९९८ साली साताऱ्यात झाली. त्यावेळी काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा १ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर, गेल्या ४ निवडणुकांमध्ये राज्यात अशी एकही थेट लढत झाली नाही. १९९८च्या पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये (१९८९, १९९१ व १९९६) राज्यात सर्व मतदारसंघात तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत (१९५१) राज्यात तब्बल १७ ठिकाणी तर १९७७ साली १६ ठिकाणी दोनच उमेदवार रिंगणात होते.

१९८४ मध्ये फक्त सांगलीत दोन उमेंदवार होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील (काँग्रेस) यांनी जनता पार्टीचे विश्वासराव पाटील यांना पराभूत केले होते. १९८० मध्येही फक्त सांगलीतच अशी लढत झाली. त्यावेळी खुद्द वसंतदादा पाटील (काँग्रेस) यांनी विश्वासराव पाटील (जनता पार्टी) यांचा १ लाख ६७ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून २००९ पर्यंत सांगलीकरांनी लोकसभा निवडणुकीत वसंतदादा घराण्यालाच कौल दिला होता. पण गेल्यावेळी मात्र त्यांचे नातू प्रतिक पाटील यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला. यंदा येथे पाटील घराण्यातील उमेदवार विशाल पाटील (स्वाभिमानी) रिंगणात आहे, पण काँग्रेसचा उमेदवार मात्र नाही.

१९७७ साली तब्बल १६ ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. यात सांगली, राजापूर, रत्नागिरी, कुलाबा, डहाणू, नंदूरबार, एरंडोल, नांदेड, जालना, बीड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, खेड व बारामती या मतदारसंघांचा समावेश होता. नंदुरबार, सोलापूर, पंढरपूर, खेड, सांगली व इचलकरंजी या ६ ठिकाणी त्यावेळी काँग्रेसने बाजी मारली. इतर सर्व १० ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी लातुरात काट्याची लढत होऊन शेकापचे उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसचे पंढरीनाथ पाटील यांचा अवघ्या ७ हजार ८५१ मतांनी पराभव केला होता.

१९७१ मध्ये फक्त सोलापुरात दोन उमेदवार होते. त्यात काँग्रेसचे सूरजरतन दमानी यांनी पत्रकार रंगाअण्णा वैद्य (अपक्ष) यांचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. १९६७ च्या निवडणुकीत पंढरपूर, मालेगाव व नंदुरबार हे तीन राखीव मतदारसंघ आणि नाशिक अशा चार ठिकाणी दोनच उमेदवार होते. यापैकी पंढरपुरात (एससी राखीव) काँग्रेसचे टीएच सोनवणे फक्त १,०७९ मतांनी विजयी झाले होते. मालेगाव (एसटी) मध्ये काँग्रेसचे झामरू कहांडोळे यांनी फक्त ९,२०२ मतांनी बाजी मारली होती. इतर दोन मतदारसंघातील मताधिक्य ३६ हजारांहून जास्त होते.

१९६२ मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते. १९५१ म्हणजे पहिल्या निवडणुकीत तब्बल १७ ठिकाणी प्रत्येकी दोनच उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, मुंबई शहरउत्तर, चंद्रपूर, धुळे, पूर्व खांदेश, पश्चिम खांदेश, पुणे, रत्नागिरी,कराड, कोपरगाव, कुलाबा, मालेगाव व मिरज या १७ ठिकाणी दोनच उमेदवार होते.१९६२मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते.