शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:16 IST

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या.

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या. कुठे काट्याची लढत झाली, तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले. महाराष्ट्रातील अशी शेवटची थेट लढत १९९८ साली साताऱ्यात झाली. त्यावेळी काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा १ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर, गेल्या ४ निवडणुकांमध्ये राज्यात अशी एकही थेट लढत झाली नाही. १९९८च्या पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये (१९८९, १९९१ व १९९६) राज्यात सर्व मतदारसंघात तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत (१९५१) राज्यात तब्बल १७ ठिकाणी तर १९७७ साली १६ ठिकाणी दोनच उमेदवार रिंगणात होते.

१९८४ मध्ये फक्त सांगलीत दोन उमेंदवार होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील (काँग्रेस) यांनी जनता पार्टीचे विश्वासराव पाटील यांना पराभूत केले होते. १९८० मध्येही फक्त सांगलीतच अशी लढत झाली. त्यावेळी खुद्द वसंतदादा पाटील (काँग्रेस) यांनी विश्वासराव पाटील (जनता पार्टी) यांचा १ लाख ६७ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून २००९ पर्यंत सांगलीकरांनी लोकसभा निवडणुकीत वसंतदादा घराण्यालाच कौल दिला होता. पण गेल्यावेळी मात्र त्यांचे नातू प्रतिक पाटील यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला. यंदा येथे पाटील घराण्यातील उमेदवार विशाल पाटील (स्वाभिमानी) रिंगणात आहे, पण काँग्रेसचा उमेदवार मात्र नाही.

१९७७ साली तब्बल १६ ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. यात सांगली, राजापूर, रत्नागिरी, कुलाबा, डहाणू, नंदूरबार, एरंडोल, नांदेड, जालना, बीड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, खेड व बारामती या मतदारसंघांचा समावेश होता. नंदुरबार, सोलापूर, पंढरपूर, खेड, सांगली व इचलकरंजी या ६ ठिकाणी त्यावेळी काँग्रेसने बाजी मारली. इतर सर्व १० ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी लातुरात काट्याची लढत होऊन शेकापचे उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसचे पंढरीनाथ पाटील यांचा अवघ्या ७ हजार ८५१ मतांनी पराभव केला होता.

१९७१ मध्ये फक्त सोलापुरात दोन उमेदवार होते. त्यात काँग्रेसचे सूरजरतन दमानी यांनी पत्रकार रंगाअण्णा वैद्य (अपक्ष) यांचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. १९६७ च्या निवडणुकीत पंढरपूर, मालेगाव व नंदुरबार हे तीन राखीव मतदारसंघ आणि नाशिक अशा चार ठिकाणी दोनच उमेदवार होते. यापैकी पंढरपुरात (एससी राखीव) काँग्रेसचे टीएच सोनवणे फक्त १,०७९ मतांनी विजयी झाले होते. मालेगाव (एसटी) मध्ये काँग्रेसचे झामरू कहांडोळे यांनी फक्त ९,२०२ मतांनी बाजी मारली होती. इतर दोन मतदारसंघातील मताधिक्य ३६ हजारांहून जास्त होते.

१९६२ मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते. १९५१ म्हणजे पहिल्या निवडणुकीत तब्बल १७ ठिकाणी प्रत्येकी दोनच उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, मुंबई शहरउत्तर, चंद्रपूर, धुळे, पूर्व खांदेश, पश्चिम खांदेश, पुणे, रत्नागिरी,कराड, कोपरगाव, कुलाबा, मालेगाव व मिरज या १७ ठिकाणी दोनच उमेदवार होते.१९६२मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते.