शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:28 IST

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत.

जमीर काझी मुंबई : गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत. ४ वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी मात्र अपघात व मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघाताच्या एकूण ३५ हजार ८४५ घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला.महामार्ग पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून राबविल्या जाणाºया उपाययोजनांमुळे अपघाताच्या आकडेवारीचा आलेख कमी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही सुरक्षित वाहतुकीसाठी अद्याप जनजागृतीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्टÑात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षामध्ये ३५ हजार ८४५ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ मृत्यू, तर अनुक्रमे २०,४९१ व ११,६८५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. २०१५च्या तुलनेत अपघाताची संख्या ४ हजार २३ ने कमी झाली आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ७२० ने कमी झाले आहे. २०१४ मध्ये ६१ हजार ६२७ अपघात व १२ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ६३ हजार ८०५ व १३,१५१ इतके होते.एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत वाढमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या २ वर्षांमध्ये एकूण ६४१ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १८६ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २८१ अपघातांत ९७ जण ठार झाले होते, तर १५३ गंभीर जखमी होते. २०१७ मध्ये अपघाताची संख्या ३६० पर्यंत वाढली असली, तरी ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात व किरकोळ जखमींची संख्या अनुक्रमे १५६ व ४४ इतकी आहे.सुरक्षित व अपघातविरहित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाहनधारकांनी शिस्त व नियमांची अंमलबजावणी केल्यास दुर्घटनेचे प्रमाण आणखी कमी होईल.- आर. के. पद्मनाभन, अपर महासंचालक,वाहतूक, महामार्ग राज्य पोलीस

टॅग्स :Accidentअपघात