शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:28 IST

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत.

जमीर काझी मुंबई : गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत. ४ वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी मात्र अपघात व मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघाताच्या एकूण ३५ हजार ८४५ घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला.महामार्ग पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून राबविल्या जाणाºया उपाययोजनांमुळे अपघाताच्या आकडेवारीचा आलेख कमी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही सुरक्षित वाहतुकीसाठी अद्याप जनजागृतीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्टÑात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षामध्ये ३५ हजार ८४५ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ मृत्यू, तर अनुक्रमे २०,४९१ व ११,६८५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. २०१५च्या तुलनेत अपघाताची संख्या ४ हजार २३ ने कमी झाली आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ७२० ने कमी झाले आहे. २०१४ मध्ये ६१ हजार ६२७ अपघात व १२ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ६३ हजार ८०५ व १३,१५१ इतके होते.एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत वाढमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या २ वर्षांमध्ये एकूण ६४१ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १८६ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २८१ अपघातांत ९७ जण ठार झाले होते, तर १५३ गंभीर जखमी होते. २०१७ मध्ये अपघाताची संख्या ३६० पर्यंत वाढली असली, तरी ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात व किरकोळ जखमींची संख्या अनुक्रमे १५६ व ४४ इतकी आहे.सुरक्षित व अपघातविरहित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाहनधारकांनी शिस्त व नियमांची अंमलबजावणी केल्यास दुर्घटनेचे प्रमाण आणखी कमी होईल.- आर. के. पद्मनाभन, अपर महासंचालक,वाहतूक, महामार्ग राज्य पोलीस

टॅग्स :Accidentअपघात