शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:28 IST

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत.

जमीर काझी मुंबई : गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत. ४ वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी मात्र अपघात व मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघाताच्या एकूण ३५ हजार ८४५ घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला.महामार्ग पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून राबविल्या जाणाºया उपाययोजनांमुळे अपघाताच्या आकडेवारीचा आलेख कमी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही सुरक्षित वाहतुकीसाठी अद्याप जनजागृतीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्टÑात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षामध्ये ३५ हजार ८४५ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ मृत्यू, तर अनुक्रमे २०,४९१ व ११,६८५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. २०१५च्या तुलनेत अपघाताची संख्या ४ हजार २३ ने कमी झाली आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ७२० ने कमी झाले आहे. २०१४ मध्ये ६१ हजार ६२७ अपघात व १२ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ६३ हजार ८०५ व १३,१५१ इतके होते.एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत वाढमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या २ वर्षांमध्ये एकूण ६४१ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १८६ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २८१ अपघातांत ९७ जण ठार झाले होते, तर १५३ गंभीर जखमी होते. २०१७ मध्ये अपघाताची संख्या ३६० पर्यंत वाढली असली, तरी ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात व किरकोळ जखमींची संख्या अनुक्रमे १५६ व ४४ इतकी आहे.सुरक्षित व अपघातविरहित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाहनधारकांनी शिस्त व नियमांची अंमलबजावणी केल्यास दुर्घटनेचे प्रमाण आणखी कमी होईल.- आर. के. पद्मनाभन, अपर महासंचालक,वाहतूक, महामार्ग राज्य पोलीस

टॅग्स :Accidentअपघात