राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:28 AM2018-02-19T04:28:40+5:302018-02-19T04:28:47+5:30

गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत.

51,000 deaths in road accidents across the state in 4 years | राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

राज्यभरात ४ वर्षांत अपघातात ५१ हजार जणांचा मृत्यू

googlenewsNext

जमीर काझी 
मुंबई : गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध महामार्ग व शहरांमध्ये २ लाख १,१५५ अपघात झाले. यामध्ये ५१ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ८८ हजार ३६६ वाहनधारक कायमचे जायबंदी झाले आहेत. ४ वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी मात्र अपघात व मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१७ मध्ये अपघाताच्या एकूण ३५ हजार ८४५ घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला.
महामार्ग पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेकडून राबविल्या जाणाºया उपाययोजनांमुळे अपघाताच्या आकडेवारीचा आलेख कमी होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही सुरक्षित वाहतुकीसाठी अद्याप जनजागृतीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्टÑात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षामध्ये ३५ हजार ८४५ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १२ हजार २१५ मृत्यू, तर अनुक्रमे २०,४९१ व ११,६८५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. २०१५च्या तुलनेत अपघाताची संख्या ४ हजार २३ ने कमी झाली आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण ७२० ने कमी झाले आहे. २०१४ मध्ये ६१ हजार ६२७ अपघात व १२ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ६३ हजार ८०५ व १३,१५१ इतके होते.

एक्स्प्रेस-वेवरील अपघातांत वाढ
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या २ वर्षांमध्ये एकूण ६४१ अपघाताच्या घटना घडल्या. त्यामध्ये १८६ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २८१ अपघातांत ९७ जण ठार झाले होते, तर १५३ गंभीर जखमी होते. २०१७ मध्ये अपघाताची संख्या ३६० पर्यंत वाढली असली, तरी ८९ मृत्यू तर १०५ गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात व किरकोळ जखमींची संख्या अनुक्रमे १५६ व ४४ इतकी आहे.

सुरक्षित व अपघातविरहित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. वाहनधारकांनी शिस्त व नियमांची अंमलबजावणी केल्यास दुर्घटनेचे प्रमाण आणखी कमी होईल.
- आर. के. पद्मनाभन, अपर महासंचालक,
वाहतूक, महामार्ग राज्य पोलीस

Web Title: 51,000 deaths in road accidents across the state in 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात