शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

राज्यात ५० हजार पोलिसांची होणार भरती, ७५ पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:55 IST

Police : विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले.

मुंबई : राज्यातील पोलीस बळ कमी आहे. पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ आणि पोलीस व्यवस्था बळकट केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधिमंडळात केली. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात जुन्या, मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांच्या नव्या इमारती उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. 

विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आर. आर. पाटील गृहमंत्री असताना ६० हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्या काळात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील ५ हजार २०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील सात हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार लवकरच तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाईल, असे आश्वासनही वळसे-पाटील यांनी दिले.

अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत पोलीस विभागाने मोठी कारवाई केली. मात्र एनसीबीसारखी राज्य पोलीस दलाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७,१८७ गुन्हे दाखल झाले असून, १५४ कोटी ४२ लाख किमतीचे ३५ हजार ७०० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३३ लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या तुलनेत अमली पदार्थाच्या विरोधातील राज्याच्या तपासात दर्जा असून काही ग्राम कारवाईवर न थांबता मोठी जप्तीची कारवाई महाराष्ट्र पोलीस दलाने केल्याचे त्यांनी सांगितले.

‘बदलीसाठी पैसे मागितल्यास थेट तक्रार करा’

पोलीस बदल्यांबाबतही गृहमंत्र्यांनी भाष्य केले. बदलीसाठी कुणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. जर कुणी पैसे मागत असेल तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांची नवी इमारत उभारली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील