शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५० हजार पोलिसांची होणार भरती, ७५ पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:55 IST

Police : विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले.

मुंबई : राज्यातील पोलीस बळ कमी आहे. पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ आणि पोलीस व्यवस्था बळकट केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधिमंडळात केली. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात जुन्या, मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांच्या नव्या इमारती उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. 

विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आर. आर. पाटील गृहमंत्री असताना ६० हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्या काळात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील ५ हजार २०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील सात हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार लवकरच तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाईल, असे आश्वासनही वळसे-पाटील यांनी दिले.

अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत पोलीस विभागाने मोठी कारवाई केली. मात्र एनसीबीसारखी राज्य पोलीस दलाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७,१८७ गुन्हे दाखल झाले असून, १५४ कोटी ४२ लाख किमतीचे ३५ हजार ७०० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३३ लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या तुलनेत अमली पदार्थाच्या विरोधातील राज्याच्या तपासात दर्जा असून काही ग्राम कारवाईवर न थांबता मोठी जप्तीची कारवाई महाराष्ट्र पोलीस दलाने केल्याचे त्यांनी सांगितले.

‘बदलीसाठी पैसे मागितल्यास थेट तक्रार करा’

पोलीस बदल्यांबाबतही गृहमंत्र्यांनी भाष्य केले. बदलीसाठी कुणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. जर कुणी पैसे मागत असेल तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांची नवी इमारत उभारली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील