शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज्यात ५० हजार पोलिसांची होणार भरती, ७५ पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:55 IST

Police : विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले.

मुंबई : राज्यातील पोलीस बळ कमी आहे. पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ आणि पोलीस व्यवस्था बळकट केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधिमंडळात केली. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात जुन्या, मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांच्या नव्या इमारती उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. 

विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आर. आर. पाटील गृहमंत्री असताना ६० हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्या काळात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील ५ हजार २०० पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील सात हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार लवकरच तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच पोलीस व्यवस्था बळकट करण्यासाठी ५० हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाईल, असे आश्वासनही वळसे-पाटील यांनी दिले.

अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत पोलीस विभागाने मोठी कारवाई केली. मात्र एनसीबीसारखी राज्य पोलीस दलाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७,१८७ गुन्हे दाखल झाले असून, १५४ कोटी ४२ लाख किमतीचे ३५ हजार ७०० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३३ लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या तुलनेत अमली पदार्थाच्या विरोधातील राज्याच्या तपासात दर्जा असून काही ग्राम कारवाईवर न थांबता मोठी जप्तीची कारवाई महाराष्ट्र पोलीस दलाने केल्याचे त्यांनी सांगितले.

‘बदलीसाठी पैसे मागितल्यास थेट तक्रार करा’

पोलीस बदल्यांबाबतही गृहमंत्र्यांनी भाष्य केले. बदलीसाठी कुणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. जर कुणी पैसे मागत असेल तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात मोडकळीस आलेल्या ७५ पोलीस स्थानकांची नवी इमारत उभारली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील