शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

महाराष्ट्रात ५० हजार कोटींचा ‘डेडिकेटेड कॉरिडॉर’ उभारणार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:20 IST

Raosaheb Danve : डेडिकेटेड कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटी या मालवाहतूक बंदराला जोडणार आहे. रेल्वेने होणारी मालवाहतूक थेट जेएनपीटीच्या बंदरात गतीने पोहोचण्यास याची मोठी मदत होईल, असे दानवे यांनी सांगितले.   

- संजय देशमुख  

जालना : महाराष्ट्राचा विचार करता ५० हजार कोटी रुपयांच्या डेडिकेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यासाठी  आपले प्राधान्य राहणार असून, त्यासाठी राज्य सरकारसह त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यातील अडथळे दूर करणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.    रेल्वेची कामे कधीही न संपणारी असतात. ती कामे एका रात्रीत किंवा एखाद्या वर्षात पूर्ण होतीलच असे नसते. त्यामुळे जी कामे हाती घेतली आहेत, त्यातील कामांचे प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्यावर भर असतो. महिनाभरापूर्वीच आपल्याकडे या खात्याची जबाबदारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी सोपविली आहे.  या महिनाभरात अनेक  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यातील प्राधान्यक्रम समजावून घेतला. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे डेडिकेटेड कॉरिडॉर हा ५० हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून, यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. मुंबईजवळील पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी देखील याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.  

कॉरिडॉर जेएनपीटीला जोडणार डेडिकेटेड कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटी या मालवाहतूक बंदराला जोडणार आहे. रेल्वेने होणारी मालवाहतूक थेट जेएनपीटीच्या बंदरात गतीने पोहोचण्यास याची मोठी मदत होईल, असे दानवे यांनी सांगितले.   

खासदारांची बैठक घेणार मराठवाड्यातील रेल्वे समस्यांवर मार्ग काढण्यासह रेल्वेची कोणकोणती कामे ही प्राधान्यक्रमाने मराठवाड्यात आवश्यक आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी लवकरच मराठवाड्यातील १२ खासदारांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यासंदर्भातील सूचना नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना सकाळीच दिल्याचे दानवे यांनी सांगितले.  

चाळीस दिवस मतदारसंघापासून दूर ७ जून रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात त्यांना अत्यंत महत्त्वाची अशी तीन खाती मिळाली. रेल्वेसह कोळसा आणि खाण ही खाती त्यांना देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली न सोडण्याची सूचना केली होती. मतदारसंघातील हजारो चाहत्यांनी दिल्लीत येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या; परंतु सलग चाळीस दिवस आपण आपल्या मतदारसंघापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वे