शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

विवाहबाह्य संबंधामुळे ५०० संसार उघड्यावर; पती-पत्नीच्या मित्र मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 18:26 IST

खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे. 

- गजानन राऊत

खामगाव : खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे. ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त या विषयाचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या युगामध्ये महिला आणि पुरूष समान आहेत. काही ठिकाणी महिला पुरूषांपेक्षा जास्त मेहनत करणा-या दिसतात. नोकरी करून घरकाम करणे आणि नव-याचे पण ऐकणे हे सर्व करत असताना खुप मोठी कसरत महिलांना करावी लागते. परंतु सध्याच्या व्हॉटसअप आणि फेसबुकच्या जमान्यात मात्र पती-पत्नीचा संवादच कमी असल्याने एकमेकांविषयी असलेला गैरसमज वाढत जातो आणि त्याचे रूपांतर विभाजनात होताना दिसत आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात ५०० प्रकरणे विवाहबाह्य संबंधाची म्हणजेच अनैतिक संबंधाची दाखल झाले असल्याने आणि हे करत असताना शिक्षा पात्र गुन्हा नसल्यामुळे कायद्याविषयी कुठलीही भिती लोकांमध्ये राहिलेली दिसत नाही. 

बदलती जीवनशैली...सोशलमिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधात दूरी निर्माण होत आहे. एकमेकांच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. आणि एकमेकांकडून अपेक्षाही वाढत आहेत. यामध्येच अहंकार वाढत असल्याने पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने कोणी कोणाचे ऐकायचे आणि कोणी कोणाला समजून घ्यायचे ह्यासाठीच चढाओढ लागलेली असते. समोरच्याने बदल करावे मी बदल करणार नाही अशा अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते. अपत्य प्राप्तीनंतर पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नाही. दोघा पती-पत्नीमध्ये दोघांच्याही मित्र-मैत्रीणींचा वाढता हस्तक्षेप असल्याने विभाजन करण्याला हे कारण सुद्धा पुरेसे ठरत आहे. कायद्याबद्दल भिती नसल्यामुळे पहिली पत्नी असतानाही सर्रासपणे दुसरे लग्न करताना पुरूष मंडळी सहज दिसत आहेत. अनैतिक संबंधामुळे दोघा पती-पत्नीमध्ये होणारे सततचे वादविवाद सुद्धा विकोपाला जाताना दिसतात. टिव्ही, मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक यांच्या सततच्या वापरामुळे पती-पत्नी यांच्यामधील संवाद खुपच कमी झाला आहे. पती-पत्नीचा केवळ मोबाईल वरच व्यवहारीक संवाद होत असल्याने त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. 

बदलती मानसिकता...दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा, स्वभाव जर जुडत नसतील तर विभक्त व्हा अशी संकल्पना समाजामध्ये रूजत असल्याने अनेक सुशिक्षित जोडप्यांचे विचार असल्याचे निष्पन्न होत आहे. 

मागील चार वर्षात ४९२ प्रकरण दाखल झाले. त्यापैकी ४५८ प्रकरणे अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध असल्याचे होते. यापैकी २३८ प्रकरणांचा निपटारा झाला. आणि उर्वरीत जोडप्यांना काऊंन्सिलींग करणे सुरू आहे.- स्वाती इंगळे, प्रिती मगरसमुपदेशक, महिला तक्रार निवारण केंद्र, पोलीस स्टेशन खामगाव

टॅग्स :Divorceघटस्फोटCrimeगुन्हा