शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

विवाहबाह्य संबंधामुळे ५०० संसार उघड्यावर; पती-पत्नीच्या मित्र मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 18:26 IST

खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे. 

- गजानन राऊत

खामगाव : खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे. ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त या विषयाचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या युगामध्ये महिला आणि पुरूष समान आहेत. काही ठिकाणी महिला पुरूषांपेक्षा जास्त मेहनत करणा-या दिसतात. नोकरी करून घरकाम करणे आणि नव-याचे पण ऐकणे हे सर्व करत असताना खुप मोठी कसरत महिलांना करावी लागते. परंतु सध्याच्या व्हॉटसअप आणि फेसबुकच्या जमान्यात मात्र पती-पत्नीचा संवादच कमी असल्याने एकमेकांविषयी असलेला गैरसमज वाढत जातो आणि त्याचे रूपांतर विभाजनात होताना दिसत आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात ५०० प्रकरणे विवाहबाह्य संबंधाची म्हणजेच अनैतिक संबंधाची दाखल झाले असल्याने आणि हे करत असताना शिक्षा पात्र गुन्हा नसल्यामुळे कायद्याविषयी कुठलीही भिती लोकांमध्ये राहिलेली दिसत नाही. 

बदलती जीवनशैली...सोशलमिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधात दूरी निर्माण होत आहे. एकमेकांच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. आणि एकमेकांकडून अपेक्षाही वाढत आहेत. यामध्येच अहंकार वाढत असल्याने पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने कोणी कोणाचे ऐकायचे आणि कोणी कोणाला समजून घ्यायचे ह्यासाठीच चढाओढ लागलेली असते. समोरच्याने बदल करावे मी बदल करणार नाही अशा अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते. अपत्य प्राप्तीनंतर पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नाही. दोघा पती-पत्नीमध्ये दोघांच्याही मित्र-मैत्रीणींचा वाढता हस्तक्षेप असल्याने विभाजन करण्याला हे कारण सुद्धा पुरेसे ठरत आहे. कायद्याबद्दल भिती नसल्यामुळे पहिली पत्नी असतानाही सर्रासपणे दुसरे लग्न करताना पुरूष मंडळी सहज दिसत आहेत. अनैतिक संबंधामुळे दोघा पती-पत्नीमध्ये होणारे सततचे वादविवाद सुद्धा विकोपाला जाताना दिसतात. टिव्ही, मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक यांच्या सततच्या वापरामुळे पती-पत्नी यांच्यामधील संवाद खुपच कमी झाला आहे. पती-पत्नीचा केवळ मोबाईल वरच व्यवहारीक संवाद होत असल्याने त्यांच्यामध्ये वादविवाद होतात. 

बदलती मानसिकता...दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा, स्वभाव जर जुडत नसतील तर विभक्त व्हा अशी संकल्पना समाजामध्ये रूजत असल्याने अनेक सुशिक्षित जोडप्यांचे विचार असल्याचे निष्पन्न होत आहे. 

मागील चार वर्षात ४९२ प्रकरण दाखल झाले. त्यापैकी ४५८ प्रकरणे अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध असल्याचे होते. यापैकी २३८ प्रकरणांचा निपटारा झाला. आणि उर्वरीत जोडप्यांना काऊंन्सिलींग करणे सुरू आहे.- स्वाती इंगळे, प्रिती मगरसमुपदेशक, महिला तक्रार निवारण केंद्र, पोलीस स्टेशन खामगाव

टॅग्स :Divorceघटस्फोटCrimeगुन्हा