शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:51 IST

सेना, मनसेच्या युनियनच्याही पदरी निराशाच

नवी मुंबई : पावणे येथील गारमेंट कंपनीतील सुमारे ५०० कामगारांना गेल्या दीड वर्षापासून वेतन मिळालेले नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा तोटा झाल्याच्या कारणावरून कंपनीने कामगारांचे वेतन थकवलेले आहे. यामुळे सदर कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.पावणे एमआयडीसी येथील द शर्ट इंडिया कंपनीचे कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. नोटाबंदीच्या काळापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही, यामुळे मनसे व सेना कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी नाइलाजास्तव संपाचा मार्ग पुकारला आहे. कंपनीने त्यांना वेळोवेळी थकित वेतन देण्याचे आश्वासन देऊन ते पाळलेले नाही. या बाबत कामगारांनी कंपनीच्या मालकांकडे चौकशी केली असता, नोटाबंदीच्या निर्णयानंतर कंपनी तोट्यात गेल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले; परंतु कंपनीला कामाच्या आॅर्डर मिळत असतानाही त्या नाकारल्या जात होत्या, असा कामगारांचा आरोप आहे. तसेच नोटाबंदीच्या नावाखाली कंपनी बंद करण्याचा कट रचत असल्याचीही शक्यता कामगारांकडून वर्तवली जात आहे. कामगारांनी दोन युनियनमार्फत न्याय मिळवण्याचा प्रयत्न झाला असता, सुरुवातीला चार महिन्यांचे थकित वेतन त्यांना कंपनीतर्फे देण्यात आले. मात्र, त्यानंतर उर्वरित वेतन देण्यास कंपनी असमर्थता दाखवत असल्याने कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दीड वर्षापासून अनेक जण हालाखीचे जीवन जगत आहेत. या कालावधीत बहुतेक जणांनी भविष्यासाठी जमा केलेल्या ठेवीच्या रकमा अथवा बनवलेला ऐवज मोडित काढल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. या सर्वांपुढे भविष्याची चिंता सतावत असल्याने त्यांच्याकडून न्याय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सद्यस्थितीला कंपनीकडून वेतनच मिळत नसल्याने कार्यालयीन कामगार वगळता इतर कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत कामगार मनोहर जठार व रवि गावकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कंपनीचे मालक अश्विन शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.कंपनीतील ५०० हून अधिक कामगारांचे दीड वर्षांपासूनचे थकित वेतन मिळावे, यासाठी कामगारांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत कामगारांनी न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले, त्यानुसार कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNavi Mumbaiनवी मुंबई