शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोटाबंदीपासून ५०० कामगार वेतनाविना; नवी मुंबईतील द शर्ट कंपनीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:51 IST

सेना, मनसेच्या युनियनच्याही पदरी निराशाच

नवी मुंबई : पावणे येथील गारमेंट कंपनीतील सुमारे ५०० कामगारांना गेल्या दीड वर्षापासून वेतन मिळालेले नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा तोटा झाल्याच्या कारणावरून कंपनीने कामगारांचे वेतन थकवलेले आहे. यामुळे सदर कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.पावणे एमआयडीसी येथील द शर्ट इंडिया कंपनीचे कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. नोटाबंदीच्या काळापासून त्यांना कंपनीने पगार दिलेला नाही, यामुळे मनसे व सेना कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांनी नाइलाजास्तव संपाचा मार्ग पुकारला आहे. कंपनीने त्यांना वेळोवेळी थकित वेतन देण्याचे आश्वासन देऊन ते पाळलेले नाही. या बाबत कामगारांनी कंपनीच्या मालकांकडे चौकशी केली असता, नोटाबंदीच्या निर्णयानंतर कंपनी तोट्यात गेल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले; परंतु कंपनीला कामाच्या आॅर्डर मिळत असतानाही त्या नाकारल्या जात होत्या, असा कामगारांचा आरोप आहे. तसेच नोटाबंदीच्या नावाखाली कंपनी बंद करण्याचा कट रचत असल्याचीही शक्यता कामगारांकडून वर्तवली जात आहे. कामगारांनी दोन युनियनमार्फत न्याय मिळवण्याचा प्रयत्न झाला असता, सुरुवातीला चार महिन्यांचे थकित वेतन त्यांना कंपनीतर्फे देण्यात आले. मात्र, त्यानंतर उर्वरित वेतन देण्यास कंपनी असमर्थता दाखवत असल्याने कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दीड वर्षापासून अनेक जण हालाखीचे जीवन जगत आहेत. या कालावधीत बहुतेक जणांनी भविष्यासाठी जमा केलेल्या ठेवीच्या रकमा अथवा बनवलेला ऐवज मोडित काढल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. या सर्वांपुढे भविष्याची चिंता सतावत असल्याने त्यांच्याकडून न्याय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सद्यस्थितीला कंपनीकडून वेतनच मिळत नसल्याने कार्यालयीन कामगार वगळता इतर कामगार गेल्या सहा महिन्यांपासून संपावर आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत कामगार मनोहर जठार व रवि गावकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कंपनीचे मालक अश्विन शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.कंपनीतील ५०० हून अधिक कामगारांचे दीड वर्षांपासूनचे थकित वेतन मिळावे, यासाठी कामगारांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत कामगारांनी न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले, त्यानुसार कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNavi Mumbaiनवी मुंबई