शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

खासगी पॉलिटेक्निक्सकडून ५०० कोटींची लूट

By admin | Updated: January 17, 2016 04:00 IST

राज्यातील खासगी पॉलिटेक्निक कॉलेजांनी बोगस प्रवेश, कागदोपत्री नोंदी, एकाच विद्यार्थ्याचे दोन ठिकाणी प्रवेश अशा शकली लढवत गेल्या सहा वर्षांत शासकीय तिजोरीवर ५०० कोटी रुपयांचा डल्ला

- यदु जोशी,  मुंबई

राज्यातील खासगी पॉलिटेक्निक कॉलेजांनी बोगस प्रवेश, कागदोपत्री नोंदी, एकाच विद्यार्थ्याचे दोन ठिकाणी प्रवेश अशा शकली लढवत गेल्या सहा वर्षांत शासकीय तिजोरीवर ५०० कोटी रुपयांचा डल्ला मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना तर आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अंतर्गत निर्वाहभत्ता या विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क या तिन्हींचा लाभ हा पॉलिटेक्निक कॉलेज चालविणाऱ्या संस्थांना मिळतो. या कॉलेजांमध्ये २००९-१० ते २०१४-१५ या काळात ६ लाख ८८ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नामांकन केले. प्रत्यक्षात प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेला ४ लाख ७७ हजार ९३६ विद्यार्थीच बसले. याचा अर्थ २ लाख १० हजार २६२ विद्यार्थी परीक्षेला बसलेच नाहीत. तरीही सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सगळ्यांच्या नावावर कॉलेजांना कोट्यवधी रुपयांची कमाई झाली. नामांकन झालेले विद्यार्थी आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांच्या संख्येत तब्बल दोन लाखांचा फरक असणे हा एक विक्रम आहे. तो कसा आणि का करण्यात आला? अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या २ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ६८ हजार विद्यार्थी हे मागासवर्गीय होते. त्यांच्या नावावर संस्थांचं चांगभलं झालं. एकूण ६०८ कोटी रुपये शासकीय तिजोरीतून वाटण्यात आले. यातील ५० ते ६० कोटी रुपये निर्वाहभत्त्यापोटी दिले तर अन्य रक्कम कॉलेजांच्या खात्यात गेली. आपला प्रवेश झाल्याचे अनेक विद्यार्थ्यांना माहितीच नव्हते. केवळ सामाजिक न्याय किंवा आदिवासी विभागाच्या वेबसाईटवर शिष्यवृत्तीसाठी त्यांची नावे नोंदविली गेली, असेही प्रकार घडले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात २००९-१० ते २०१४-१५ या काळात खासगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बोगस प्रवेश वा परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावे किमान ५०० कोटी रुपये संस्थाचालकांच्या घशात गेल्याची माहिती सदर प्रतिनिधीच्या हाती आली आहे. राज्यातील एकूण खासगी पॉलिटेक्निक कॉलेजांची संख्या ६७८ आहे. घोटाळे सगळ्याच ठिकाणी झाले असे मात्र नाही. अल्प मुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली झालेल्या लुटीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आधीच जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आता पॉलिटेक्निकमधील घोटाळ्याची पुरवणी माहिती सादर करण्यात आली आहे. लोकमतने उघड केलेल्या घोटाळ्यांसाठी टास्क फोर्सअल्पमुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याची खळबळजनक मालिका लोकमतचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अभिनव खोपडे यांनी दोन वर्षांपूर्वी चालविली होती. त्याची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दलाची (टास्क फोर्स ) स्थापना गृह विभागाने शनिवारी केली. अपर पोलीस महासंचालक के.व्यंकटेशम हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त पीयूष सिंह आणि राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल हे सदस्य असतील. मी आश्वासन देऊनही हा टास्क फोर्स वर्षभर का स्थापन झाला नाही, अशी संतप्त विचारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. या बाबत दिरंगाई करणारे कक्ष अधिकारी ए.एस.जोशी यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्तही सर्वप्रथम लोकमतनेच दिले होते. सखोल चौकशी केली जाईलगेल्या सरकारच्या काळात झालेल्या या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल. ज्या-ज्या संस्थांनी असा पैसा उकळला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा गोरखधंदा यापुढे चालणार नाही. जे विद्यार्थी परीक्षेला बसतील त्यांनाच शिष्यवृत्ती द्या, असा आदेश तत्काळ काढण्यात येईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री