शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास शिवसेना नेत्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:47 IST

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मूळ धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर : भंडारदरा धरणातून मराठवाडा जायकवाडीसाठी ४ हजार ५०० क्यूसेक ने सकाळी ९वाजण्याच्या सुमारास पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, नेवासा तालुक्यातील शेतकरी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मूळ धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या तीन दिवसांत निळवंडे धरण पूर्ण भरून घेणार असून ओझर बंधाऱ्याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रातील के. टी. वेअरच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात पाणी जायकवाडीकडे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

दरम्यान, नाशिकच्या भावली धरणातील पाणी ठाणे जिल्ह्यातील शहापुरलाही देण्यात येणार असून या धरणातील पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे भावली धरणावरूनही वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून गुरुवारपासून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला इगतपुरी तालुका शिवसेनेने कडवा विरोध केला असून या धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह धरणालगतच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

पाणी रोखण्यासाठी शिवसेनेने आजपासूनच दारणा धरणावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, हा विरोध झुगारून जर पाणी सोडले तर  आंदोलन आक्रमक करून सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरणNashikनाशिक