शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास शिवसेना नेत्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:47 IST

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मूळ धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर : भंडारदरा धरणातून मराठवाडा जायकवाडीसाठी ४ हजार ५०० क्यूसेक ने सकाळी ९वाजण्याच्या सुमारास पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, नेवासा तालुक्यातील शेतकरी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मूळ धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या तीन दिवसांत निळवंडे धरण पूर्ण भरून घेणार असून ओझर बंधाऱ्याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रातील के. टी. वेअरच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात पाणी जायकवाडीकडे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

दरम्यान, नाशिकच्या भावली धरणातील पाणी ठाणे जिल्ह्यातील शहापुरलाही देण्यात येणार असून या धरणातील पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे भावली धरणावरूनही वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून गुरुवारपासून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला इगतपुरी तालुका शिवसेनेने कडवा विरोध केला असून या धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह धरणालगतच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

पाणी रोखण्यासाठी शिवसेनेने आजपासूनच दारणा धरणावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, हा विरोध झुगारून जर पाणी सोडले तर  आंदोलन आक्रमक करून सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरणNashikनाशिक