शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

केडीएमटीत लवकरच ४० मिडी बस

By admin | Updated: April 5, 2017 04:04 IST

केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १८५ बसपैकी ४० मिडी बस लवकरच केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत

कल्याण : केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १८५ बसपैकी ४० मिडी बस लवकरच केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. परंतु, मनुष्यबळाअभावी त्या बसचे नियोजनही कोलमडणार आहे. त्यादेखील आगारातच धूळखात पडण्याची दाट शक्यता आहे. यात गणेशघाट आगारातील भंगार अवस्थेतील ५६ बस ‘जैसे थे’ असल्याने तेथील विकासालाही अडथळा निर्माण झाला आहे. बीएस ३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मंजूर झालेल्या आणि ३१ मार्चपूर्वी खरेदी केलेल्या ‘बीएस ३’च्या ४० मिडी बस लवकरच केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परंतु, या बस ठेवण्यासाठी आगाराची जागा कमी पडत आहे. त्यात वाहक आणि चालकांचीही कमतरता असल्याने नवीन दाखल होणाऱ्या मिडी बसचे नियोजनही पुरते कोलमडणार आहे. जीसीसी कंत्राटाच्या माध्यमातून चालक आणि वाहकांची भरती केली जाणार आहे. मात्र याला अद्यापपर्यंत सीआयआरटीची मान्यता न मिळाल्याने भरती प्रक्रियाही रखडली आहे.जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत केडीएमटीला १८५ बस मंजूर झाल्या आहेत. यातील ७१ बस सध्या केडीएमटीच्या ताफ्यात आहेत. लवकरच ४० मीडी बस दाखल होणार आहेत. यानंतर दाखल होणाऱ्या बस बीएस ४ इंजिनाच्या असणार असून, त्यासाठी उपक्रमाला ४ ते ५ लाख रुपये जादा मोजावे लागणार आहेत. परिवहन उपक्रमाकडून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महसुली खर्चापोटी ६७ कोटी ४९ लाख रुपये अनुदान मिळावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने स्थायीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात ४३ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यात स्थायी समितीने २ कोटींची वाढ करीत ती ४५ कोटी केली आहे. दरवर्षी जी तरतूद केली जाते ती देखील पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे उपक्रमाचे म्हणणे आहे. एकीकडे निधीअभावी विकासाला खीळ बसली असताना दुसरीकडे भंगार अवस्थेतील ५६ बस देखील गणेशघाट आगारातून हटवलेल्या नाहीत. याबाबत परिवहन समिती, स्थायी समिती आणि महासभेत वारंवार ठराव देखील मंजूर झाले. परंतु, ठोस कृती अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे तेथील डांबरीकरणाचे काम रखडले आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे दुर्लक्ष अर्थसंकल्पाच्या महासभेत परिवहनच्या कारभाराचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाभाडे काढले होते. यात तेथील वर्षाेनुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. कार्यालय अधीक्षक राजन ननावरे यांना लाचलुचपत प्रकरणात अटक झाल्यानंतर रिक्त झालेले हे पद चार महिने उलटूनही भरण्यात आलेले नाही. एकीकडे जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत उर्वरित बस लवकरच दाखल होणार असताना अपुऱ्या मनुष्यबळापुढे त्यांचे नियोजन कसे करायचे, असा यक्षप्रश्न उपक्रमाला पडला आहे.