शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

कॅब आणि एनआरसीमुळे ४० टक्के हिंदू बाधित होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 05:32 IST

प्रकाश आंबेडकर : २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीचे दादर टीटी येथे आंदोलन

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व दुरुस्ती (कॅब) विधेयकामुळे बाहेर देशातील मुस्लिमांवर परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, मुस्लिमांसोबत देशातील ४० टक्के हिंदू बाधित होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला .

एनआरसी व कॅबला विरोध दर्शविण्यासाठी दादर येथील आंबेडकर भवनात विविध संस्था, संघटना, साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी २६ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी दादर टीटी येथे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, एकहाती सत्ता मिळाल्याने, शिवाय केंद्रात विरोधकच राहिला नसल्याने केंद्र सरकार मनमानी कारभार करीत आहे. कॅब आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना फटका बसेल, असे म्हटले जाते, पण ते चुकीचे आहे. ४० टक्के हिंदुंवरही त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे लागणार आहेत. आदिवासी समाजाची नोंदणी १९५० मध्ये सुरू झाली, ती अद्याप पूर्ण झालेली नाही, तर भटक्या विमुक्त समाजातील कित्येकांची जन्म नोंदणीदेखील नाही, असे असताना ते पुरावे कोठून आणणार, असा सवाल त्यांनी विचारला. असे लोक या कायद्याचे बळी ठरतील.

महाराष्ट्रात जे डिटेक्शन कॅम्प बनविण्यात आले आहेत, त्यात किमान २५ लाख लोकांना आणून ठेवता येईल, इतके ते मोठे आहेत, देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत चालल्याने, हे सरकार लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे कायदे आणत असून, देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर बीपीसीएल, ओएनजीसी, रेल्वे खासगीकरण करण्याचा सरकारचा उद्योग चालू आहे, नफ्यात असलेले उद्योगधंदे मोठमोठ्या उद्योगपतींना विकण्यापेक्षा सामान्य जनतेला या कंपन्यांचे शेअर विकावे, जेणेकरून या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण राहील आणि देश चालविण्यासाठी सरकारकडे पैसादेखील येईल, असेही आंबेडकर म्हणाले.देशात जे आंदोलन चालू आहे, त्याला आमचा पाठिंबा असून, त्यांना आम्ही मदत करायला तयार आहोत. मात्र, सरकारी संपत्ती किंवा जनतेच्या संपत्तीचे नुकसान करायचे नाही, देशात आता लोकांना जागरूक करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले, तसेच या कायद्याच्या विरोधात कोणीही सुप्रीम कोर्टात जाऊ नये, हा राजकीय विषय आहे. जर न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला, तर काही करता येणार नाही. हा विषय राजकीय पद्धतीने हाताळला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

‘विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करावे’सध्या सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आह. आंदोलनाचा मार्ग योग्य आहे. जी राज्ये या कायद्याविरोधात आहेत, तेथील तरुण वर्गाने आता राजकारणात येऊन मोठी जबाबदारी हातात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी