शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 20:40 IST

पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली.

मुंबई – महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेड इथं अलीकडेच दंगल घडली. राज्यातील या परिस्थितीवर पोलिसांनी गृहविभागाला अहवाल सोपवला आहे. यात सोशल मीडियातील पोस्ट आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे राज्यात दंगल भडकली असं म्हणण्यात आलं आहे. सोशल मीडियात अशा अनेक गोष्टी पोस्ट केल्या गेल्या ज्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या. पोलीस लवकरच पोस्ट करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

या रिपोर्टमध्ये ३६ सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे. ज्यात ट्विटरवर २५ तर फेसबुकवर ६ आणि इन्स्टाग्रामवर ५ पोस्ट आहेत. त्रिपुरातील एका अफवेमुळे महाराष्ट्रात हिंसक आंदोलन होणं हे दुखदं घटना होती. पोलिसांच्या या रिपोर्टला सोशल मीडिया मॉनिटरिंग रिपोर्ट शीर्षक देत गृह विभागाला सोपवलं आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली. महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत मागील शुक्रवारी हिंसाचार घडला होता. त्यानंतर राज्यात कर्फ्यू लावण्यात आला. संवेदनशील भागात पोलीस जवानांची संख्या वाढवण्यात आली.

चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका - पोलीस

या घटनेनंतर अमरावतीत आपत्कालीन सेवा इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील कुठल्याही पोस्टवर आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्रिपुराच्या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्रात हिंसाचार वाढला. पोलिसांनी आतापर्यंत यातील ५० आरोपींना अटक केली आहे.

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य

त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - भाजपा

धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा अशी मागणी भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस