शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 20:40 IST

पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली.

मुंबई – महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेड इथं अलीकडेच दंगल घडली. राज्यातील या परिस्थितीवर पोलिसांनी गृहविभागाला अहवाल सोपवला आहे. यात सोशल मीडियातील पोस्ट आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे राज्यात दंगल भडकली असं म्हणण्यात आलं आहे. सोशल मीडियात अशा अनेक गोष्टी पोस्ट केल्या गेल्या ज्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या. पोलीस लवकरच पोस्ट करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

या रिपोर्टमध्ये ३६ सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे. ज्यात ट्विटरवर २५ तर फेसबुकवर ६ आणि इन्स्टाग्रामवर ५ पोस्ट आहेत. त्रिपुरातील एका अफवेमुळे महाराष्ट्रात हिंसक आंदोलन होणं हे दुखदं घटना होती. पोलिसांच्या या रिपोर्टला सोशल मीडिया मॉनिटरिंग रिपोर्ट शीर्षक देत गृह विभागाला सोपवलं आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली. महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत मागील शुक्रवारी हिंसाचार घडला होता. त्यानंतर राज्यात कर्फ्यू लावण्यात आला. संवेदनशील भागात पोलीस जवानांची संख्या वाढवण्यात आली.

चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका - पोलीस

या घटनेनंतर अमरावतीत आपत्कालीन सेवा इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील कुठल्याही पोस्टवर आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्रिपुराच्या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्रात हिंसाचार वाढला. पोलिसांनी आतापर्यंत यातील ५० आरोपींना अटक केली आहे.

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य

त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - भाजपा

धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा अशी मागणी भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस