शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 20:40 IST

पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली.

मुंबई – महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेड इथं अलीकडेच दंगल घडली. राज्यातील या परिस्थितीवर पोलिसांनी गृहविभागाला अहवाल सोपवला आहे. यात सोशल मीडियातील पोस्ट आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे राज्यात दंगल भडकली असं म्हणण्यात आलं आहे. सोशल मीडियात अशा अनेक गोष्टी पोस्ट केल्या गेल्या ज्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या. पोलीस लवकरच पोस्ट करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

या रिपोर्टमध्ये ३६ सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे. ज्यात ट्विटरवर २५ तर फेसबुकवर ६ आणि इन्स्टाग्रामवर ५ पोस्ट आहेत. त्रिपुरातील एका अफवेमुळे महाराष्ट्रात हिंसक आंदोलन होणं हे दुखदं घटना होती. पोलिसांच्या या रिपोर्टला सोशल मीडिया मॉनिटरिंग रिपोर्ट शीर्षक देत गृह विभागाला सोपवलं आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली. महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत मागील शुक्रवारी हिंसाचार घडला होता. त्यानंतर राज्यात कर्फ्यू लावण्यात आला. संवेदनशील भागात पोलीस जवानांची संख्या वाढवण्यात आली.

चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका - पोलीस

या घटनेनंतर अमरावतीत आपत्कालीन सेवा इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील कुठल्याही पोस्टवर आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्रिपुराच्या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्रात हिंसाचार वाढला. पोलिसांनी आतापर्यंत यातील ५० आरोपींना अटक केली आहे.

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य

त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.

राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - भाजपा

धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा अशी मागणी भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस