शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विष्णूप्रयाग येथे अडकले औरंगाबादचे ३२ पर्यटक

By admin | Updated: May 19, 2017 20:43 IST

बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत.

ऑनलाइन लोकमत/मयूर देवकर औरंगाबाद, दि. 19 - बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार पर्यटकांचा समावेश असून औरंगाबादचे ३२ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मंगेश कपोते आणि श्रीपाद जोशी यांनी दूरध्वनीद्वारे लोकमतला दिली.बद्रीनाथ ते जोशीमठ मार्गावर विष्णूप्रयाग हे गाव आहे असून मार्ग बंद झाल्यामुळे दोन्हीबाजूला हजारो वाहने जागेवर थांबलेली आहेत. प्रत्यक्षदर्शी मंगेश कपोते यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता रस्त्यावर डोंगरावरून छोटे-छोटे दगड पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आम्ही गाडी थांबवली. आमच्या मागे असणारी गाडी समोर गेली. तिला दगडांचा मारा बसला मात्र वेग वाढवून ते समोर निघून गेले. पाहतापाहता संपूर्ण डोंगरच आमच्या डोळ्यासमोर खाली कोसळला आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती ओळखून मग आम्ही गाडी वळवून सुरक्षित स्थळी आलो.संकटकाळी लयलूटविष्णूप्रयागच्या आसपास असणारे गोविंदघाट आणि पांडूकेशर गावांतील हॉटेल्समध्ये थांबण्याशिवाय पर्यटकांकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र अशा संकटसमयी मदत करायची सोडून हॉटेल मालकांनी आर्थिक कमाई करण्याचा स्वार्थ आधी पाहिला. सामान्यत: ७०० रुपये भाडे असणाऱ्या रुमचे हॉटेल मालकांनी असहाय्य पर्यटकांकडून ७ ते ८ हजार रुपये वसूल केले. त्याचबरोबर जेवणाचे दरही वाढविण्यात आले. १५ हजार पर्यटकांची व्यवस्था आसपासच्या गावात होणे शक्य नाही. म्हणून जो तो आयती चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीसांनी गावातील एका गुरुद्वारास विनंती करून ३००-४०० पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली. स्थानिकांच्या असंवेदनशीलतेमुळे हजारो लोकांनी रस्त्यावरच आश्रय घेतला. रात्री पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हालापेष्टा आणखी वाढणार असे दिसतेय, असे कपोते म्हणाले. सुरक्षित स्थळांची माहिती व सूचना पोलीस देत आहेत.सर्व नियोजनच फिसकटलेदरड कोसळल्याने चार धाम यात्रा करण्यास निघालेल्या अनेक यात्रेकरूंचे सगळे नियोजनच फिसकटले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी वाहतूक सुरू होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाचे रेल्वे आणि विमान तिकिट बुक केलेल्या यात्रेकरूंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. ऐनवेळी तिकिट व प्रवासाच्या खर्चाचा अधिक भुर्दंड सोसावा लागणार. अडक लेल्या पर्यटकांमध्ये अनेक लहान मुले आहेत. वातावरण बिघडले किंवा रस्ता लवकर सुरू झाला नाही तर काय अशी चिंता सर्वांना सतावत आहे.सुदैवाने सर्व सुखरूपउत्तराखंडच्या डोंगर भागातील या गावात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमजोर असून संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. महत्प्रयासाने मोबाईलवर कॉल लागत आहे. असे असले तरी औरंगाबादचे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे माहिती कपोती यांनी कळविली. बातमी लिहिते वेळेपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये श्रीपाद जोशी, पी. एन. देशमुख, विकास मोहरीर, तुकाराम देवकर, प्रकाश पैठणकर यांचा समावेश आहे.