शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

विष्णूप्रयाग येथे अडकले औरंगाबादचे ३२ पर्यटक

By admin | Updated: May 19, 2017 20:43 IST

बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत.

ऑनलाइन लोकमत/मयूर देवकर औरंगाबाद, दि. 19 - बद्रीनाथपासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विष्णूप्रयाग येथे शुक्रवारी (दि.१९) दरड कोसळल्यामुळे सुमारे १५ हजार पर्यटक तेथे अडकले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार पर्यटकांचा समावेश असून औरंगाबादचे ३२ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मंगेश कपोते आणि श्रीपाद जोशी यांनी दूरध्वनीद्वारे लोकमतला दिली.बद्रीनाथ ते जोशीमठ मार्गावर विष्णूप्रयाग हे गाव आहे असून मार्ग बंद झाल्यामुळे दोन्हीबाजूला हजारो वाहने जागेवर थांबलेली आहेत. प्रत्यक्षदर्शी मंगेश कपोते यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता रस्त्यावर डोंगरावरून छोटे-छोटे दगड पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आम्ही गाडी थांबवली. आमच्या मागे असणारी गाडी समोर गेली. तिला दगडांचा मारा बसला मात्र वेग वाढवून ते समोर निघून गेले. पाहतापाहता संपूर्ण डोंगरच आमच्या डोळ्यासमोर खाली कोसळला आणि रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिस्थिती ओळखून मग आम्ही गाडी वळवून सुरक्षित स्थळी आलो.संकटकाळी लयलूटविष्णूप्रयागच्या आसपास असणारे गोविंदघाट आणि पांडूकेशर गावांतील हॉटेल्समध्ये थांबण्याशिवाय पर्यटकांकडे दुसरा पर्याय नव्हता. मात्र अशा संकटसमयी मदत करायची सोडून हॉटेल मालकांनी आर्थिक कमाई करण्याचा स्वार्थ आधी पाहिला. सामान्यत: ७०० रुपये भाडे असणाऱ्या रुमचे हॉटेल मालकांनी असहाय्य पर्यटकांकडून ७ ते ८ हजार रुपये वसूल केले. त्याचबरोबर जेवणाचे दरही वाढविण्यात आले. १५ हजार पर्यटकांची व्यवस्था आसपासच्या गावात होणे शक्य नाही. म्हणून जो तो आयती चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीसांनी गावातील एका गुरुद्वारास विनंती करून ३००-४०० पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली. स्थानिकांच्या असंवेदनशीलतेमुळे हजारो लोकांनी रस्त्यावरच आश्रय घेतला. रात्री पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हालापेष्टा आणखी वाढणार असे दिसतेय, असे कपोते म्हणाले. सुरक्षित स्थळांची माहिती व सूचना पोलीस देत आहेत.सर्व नियोजनच फिसकटलेदरड कोसळल्याने चार धाम यात्रा करण्यास निघालेल्या अनेक यात्रेकरूंचे सगळे नियोजनच फिसकटले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी वाहतूक सुरू होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाचे रेल्वे आणि विमान तिकिट बुक केलेल्या यात्रेकरूंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. ऐनवेळी तिकिट व प्रवासाच्या खर्चाचा अधिक भुर्दंड सोसावा लागणार. अडक लेल्या पर्यटकांमध्ये अनेक लहान मुले आहेत. वातावरण बिघडले किंवा रस्ता लवकर सुरू झाला नाही तर काय अशी चिंता सर्वांना सतावत आहे.सुदैवाने सर्व सुखरूपउत्तराखंडच्या डोंगर भागातील या गावात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमजोर असून संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. महत्प्रयासाने मोबाईलवर कॉल लागत आहे. असे असले तरी औरंगाबादचे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे माहिती कपोती यांनी कळविली. बातमी लिहिते वेळेपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अडकलेल्या पर्यटकांमध्ये श्रीपाद जोशी, पी. एन. देशमुख, विकास मोहरीर, तुकाराम देवकर, प्रकाश पैठणकर यांचा समावेश आहे.