शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

महाराष्ट्रामध्ये चार वर्षांत ३२ वाघांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:49 IST

गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले

 - गणेश वासनिक 

अमरावती  - गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. वाघांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना जाब विचारला आहे.मध्य भारतात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक ३०० हून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांची संख्या दुप्पट झाली. व्याघ्र संवर्धनाचे हे मॉडल उत्तर प्रदेशने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात वाघांचे संरक्षण व संवर्धन कसे केले जाते, याचे धडे वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी उत्तर प्रदेशला दिले. राज्यात मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्याद्री, बोर, नवेगाव-नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प असून, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेंच, मेळघाट, ताडोबा आणि बोर प्रकल्पांच्या सीमा वाढविण्यावर भर दिला जात आहे. असे असले तरी गेल्या चार वर्षात बेहलिया टोळीने विदर्भातील वाघांना शिकारीच्या जाळ्यात अडकविले आहे. त्यांच्याकडून वाढता धोका लक्षात घेऊन व्याघ्र कृती दल निर्माण करून पेसा कायद्यानुसार मेळघाटात वनकर्मचाºयांची भरती करण्यात आली. जीपीएस प्रणाली, कॅमेरा ट्रॅपिंग अशा अद्ययावत यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमधून जाणा-या महामार्गाचा धोकादेखील वाघांना निर्माण झालेला आहे. 

असा झाला वाघांचा अंतगेल्या चार वर्षांत राज्यात विशेषत: विदर्भात एकूण ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. याला विविध कारणे आहेत. वाघांचे २३ मृत्यू नैसर्गिक, आठ शिकारीमुळे, तर एक वाघ अपघातात ठार झाला. जानेवारी २०१८ पर्यंतची ही आकडेवारी राज्याच्या वन्यजीव विभागाने शासनाला सादर केली आहे. 

उपाययोजनांचा आढावावाघांच्या संरक्षणासाठी राज्य शासन गंभीर असले तरी व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाºया उपाययोजना तोकड्या असल्याचे मानले जाते. व्याघ्र संवर्धनासाठी निधी, कर्मचाºयांची कमतरता ही नित्याचीच बाब आहे.

शिका-यांचा डोळाविदर्भात वाघांची संख्या २२० ते २३५ च्या आसपास आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील बहेलिया टोळीने शिकारीसाठी विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना लक्ष केले आहेत. चार वर्षांत ३२ वाघांच्या मृत्यूने राज्य शासन खडबडून जागे झाले आहे.

 

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र