शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महाराष्ट्रामध्ये चार वर्षांत ३२ वाघांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:49 IST

गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले

 - गणेश वासनिक 

अमरावती  - गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. वाघांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना जाब विचारला आहे.मध्य भारतात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक ३०० हून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांची संख्या दुप्पट झाली. व्याघ्र संवर्धनाचे हे मॉडल उत्तर प्रदेशने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात वाघांचे संरक्षण व संवर्धन कसे केले जाते, याचे धडे वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी उत्तर प्रदेशला दिले. राज्यात मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्याद्री, बोर, नवेगाव-नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प असून, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेंच, मेळघाट, ताडोबा आणि बोर प्रकल्पांच्या सीमा वाढविण्यावर भर दिला जात आहे. असे असले तरी गेल्या चार वर्षात बेहलिया टोळीने विदर्भातील वाघांना शिकारीच्या जाळ्यात अडकविले आहे. त्यांच्याकडून वाढता धोका लक्षात घेऊन व्याघ्र कृती दल निर्माण करून पेसा कायद्यानुसार मेळघाटात वनकर्मचाºयांची भरती करण्यात आली. जीपीएस प्रणाली, कॅमेरा ट्रॅपिंग अशा अद्ययावत यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमधून जाणा-या महामार्गाचा धोकादेखील वाघांना निर्माण झालेला आहे. 

असा झाला वाघांचा अंतगेल्या चार वर्षांत राज्यात विशेषत: विदर्भात एकूण ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. याला विविध कारणे आहेत. वाघांचे २३ मृत्यू नैसर्गिक, आठ शिकारीमुळे, तर एक वाघ अपघातात ठार झाला. जानेवारी २०१८ पर्यंतची ही आकडेवारी राज्याच्या वन्यजीव विभागाने शासनाला सादर केली आहे. 

उपाययोजनांचा आढावावाघांच्या संरक्षणासाठी राज्य शासन गंभीर असले तरी व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाºया उपाययोजना तोकड्या असल्याचे मानले जाते. व्याघ्र संवर्धनासाठी निधी, कर्मचाºयांची कमतरता ही नित्याचीच बाब आहे.

शिका-यांचा डोळाविदर्भात वाघांची संख्या २२० ते २३५ च्या आसपास आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील बहेलिया टोळीने शिकारीसाठी विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना लक्ष केले आहेत. चार वर्षांत ३२ वाघांच्या मृत्यूने राज्य शासन खडबडून जागे झाले आहे.

 

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र