शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

राज्यात आढळले उष्माघाताचे ३०३ रुग्ण, सात जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:51 IST

राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

मुंबई : राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. परिणामी, राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये १५ मार्च ते ५ मे या काळात ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उष्माघात नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, राज्यात सात जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे. यात हिंगोलीमध्ये दोघांचा बळी गेला असून बीड, परभणी आणि धुळे येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू ओढावला आहे.उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या १३८ एवढी आहे. तर नागपूरमध्ये ११२ , लातूरमध्ये ४१, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या परभणी आणि जालन्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.उन्हाच्या चटक्यामुळे जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यांत वेदना येणे अथवा रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन होणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. राज्यातील सर्व सरकारी जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. त्या वॉर्डात वातानुकूलित यंत्रणा लावावी. जेणेकरून तो संपूर्ण वॉर्ड थंड राहिला पाहिजे. त्यामुळे उष्णाघाताच्या रुग्णाला त्या ठिकाणी दाखल करून त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याला वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कूलर लावावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्याचेही डॉ. भोई यांनी सांगितले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र