शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

राज्यात आढळले उष्माघाताचे ३०३ रुग्ण, सात जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:51 IST

राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

मुंबई : राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. परिणामी, राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये १५ मार्च ते ५ मे या काळात ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उष्माघात नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, राज्यात सात जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे. यात हिंगोलीमध्ये दोघांचा बळी गेला असून बीड, परभणी आणि धुळे येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू ओढावला आहे.उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या १३८ एवढी आहे. तर नागपूरमध्ये ११२ , लातूरमध्ये ४१, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या परभणी आणि जालन्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.उन्हाच्या चटक्यामुळे जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यांत वेदना येणे अथवा रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन होणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. राज्यातील सर्व सरकारी जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. त्या वॉर्डात वातानुकूलित यंत्रणा लावावी. जेणेकरून तो संपूर्ण वॉर्ड थंड राहिला पाहिजे. त्यामुळे उष्णाघाताच्या रुग्णाला त्या ठिकाणी दाखल करून त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याला वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कूलर लावावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्याचेही डॉ. भोई यांनी सांगितले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र