शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

दुष्काळ निवारणासाठी हवे ३,००० कोटी, राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव; आज मंत्रिमंडळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:50 IST

तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये  कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जांचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

- मनोज मोघे  

मुंबई : कमी पर्जन्यमानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून केंद्राच्या निकषांनुसार ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. या तालुक्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींची मदत मागितली जाणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये  कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जांचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

उर्वरित तालुक्यांत काय? मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून दुष्काळ ठरविण्याचे निकष बैठकीत ठरविण्यात येतील. ५०० मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ