शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 10:00 IST

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नेतेमंडळी सत्तास्थापनेसाठी कसरत करण्यात व्यस्त होती. त्याचवेळी राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकासानीमुळे खचून गेलेल्या 300 शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केल्या. 

मागील चार वर्षांत एक महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा आकडा मोठा आहे. याआधी 2015 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अनेकदा  एक महिन्यात 300 आत्महत्यांचा आकडा पार केला होता. नोव्हेंबरमध्ये शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी लढत होते. तर महाराष्ट्रातील राजकीय पुढारी तोडफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त होते. 

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

दरम्यान राज्यातील मराठवाडा विभागात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 120 आत्महत्या झाल्या. तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. 2019 मध्ये एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 एवढा होता. सरकारी आकडेवारीनुसार अतिवृष्टीमुळे एक कोटी शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.