शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 10:00 IST

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नेतेमंडळी सत्तास्थापनेसाठी कसरत करण्यात व्यस्त होती. त्याचवेळी राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकासानीमुळे खचून गेलेल्या 300 शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केल्या. 

मागील चार वर्षांत एक महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा आकडा मोठा आहे. याआधी 2015 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अनेकदा  एक महिन्यात 300 आत्महत्यांचा आकडा पार केला होता. नोव्हेंबरमध्ये शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी लढत होते. तर महाराष्ट्रातील राजकीय पुढारी तोडफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त होते. 

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

दरम्यान राज्यातील मराठवाडा विभागात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 120 आत्महत्या झाल्या. तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. 2019 मध्ये एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 एवढा होता. सरकारी आकडेवारीनुसार अतिवृष्टीमुळे एक कोटी शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.