शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भिवंडीतील पिळंझे येथील आणखी ३० आदिवासी वेठबिगरीतून मुक्त; मात्र गुन्हे दाखल होऊनही आरोपी अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 22:17 IST

दै . लोकमतने देखील या अन्यायाची दाहकता सर्वांसमोर आणली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडी तालुक्यातील पिळंझे येथील चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून मागील अनेक वर्षांपासून अन्याय व अत्याचार होत असल्याचे भीषण वास्तव समोर आल्या नंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे तर दै . लोकमतने देखील या अन्यायाची दाहकता सर्वांसमोर आणली आहे. त्यानंतर आता शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या असून पिळंझे चिंचपाडा येथील आणखी ३० आदिवासी बांधवांना सावकारी वेठबिगरीतून मुक्त करण्यात आले आहे. 

भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी सोमवारी या ३० आदिवासी बांधवांना बंधबिगारी मुक्तीची प्रमाणपत्र वितरित केली आहेत. विशेष म्हणजे या आदिवासी बांधवांना सावकारी पाशात अनेक वर्षांपासून अडकवणारे कथित सावकार राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील ( दोघे रा पिळंझे ) यांच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात बंधबिगरी , मारहाण , महिलांवर अन्याय अत्याचार , मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र या दोघा कथित सावकार आरोपींना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. या दोन्ही आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्यानेच पोलीस त्यांना अटक करत नासल्याची चर्चा देखील आता सर्वत्र सुरु आहे.

पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांना मागील २५ ते ३५ वर्षांहून अधिक काळ आपल्याकडे वेठबिगारी मजूर म्हणून अडकवून ठेवले होते . पती पत्नी अशा दोघांना आठवड्याला केवळ पाचशे रुपये मजुरीवर या मजुरांना हे सावकार राबवून घेत होते . त्याच बरोबर मजुरांना मारझोड तर महिलांवर अन्याय अत्याचार सारखे कृत्य देखील या सावकारांनी केल्याचे समोर आले आहे. या आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून होणाऱ्या अन्यायाची दाहकता दैनिक लोकमतने सर्वांसमोर आणल्या नंतर वर्षानुवर्षे सावकाराच्या वेठबिगारीत अडकलेल्या आदिवासी बांधवांना दै लोकमतने धीर देत त्यांना अन्यायाविरोधात बोलते केले . त्यानंतर या सावकारांनी मागील अनेक वर्षांपासून आपल्यावर केलेल्या अन्यायाची आपबिती पोलिसांसमोर कथक केली असता वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांवर केलेल्या अन्यायाविरोधात दोघा सावकारांवर गणेशपुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबरोबरच बंधबिगारी उच्चटन अधिनियम कलमांतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र हे दोघेही आरोपी अजूनही फरार असल्याने आम्हाला अजूनही खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही अशी प्रतिक्रिया बांधबिगरीतून मुक्त झालेल्या आदिवासी बांधवांनी दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी