शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील पिळंझे येथील आणखी ३० आदिवासी वेठबिगरीतून मुक्त; मात्र गुन्हे दाखल होऊनही आरोपी अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 22:17 IST

दै . लोकमतने देखील या अन्यायाची दाहकता सर्वांसमोर आणली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडी तालुक्यातील पिळंझे येथील चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून मागील अनेक वर्षांपासून अन्याय व अत्याचार होत असल्याचे भीषण वास्तव समोर आल्या नंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे तर दै . लोकमतने देखील या अन्यायाची दाहकता सर्वांसमोर आणली आहे. त्यानंतर आता शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या असून पिळंझे चिंचपाडा येथील आणखी ३० आदिवासी बांधवांना सावकारी वेठबिगरीतून मुक्त करण्यात आले आहे. 

भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी सोमवारी या ३० आदिवासी बांधवांना बंधबिगारी मुक्तीची प्रमाणपत्र वितरित केली आहेत. विशेष म्हणजे या आदिवासी बांधवांना सावकारी पाशात अनेक वर्षांपासून अडकवणारे कथित सावकार राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील ( दोघे रा पिळंझे ) यांच्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्यात बंधबिगरी , मारहाण , महिलांवर अन्याय अत्याचार , मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र या दोघा कथित सावकार आरोपींना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. या दोन्ही आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्यानेच पोलीस त्यांना अटक करत नासल्याची चर्चा देखील आता सर्वत्र सुरु आहे.

पिळंझे चिंचपाडा येथील आदिवासी बांधवांना मागील २५ ते ३५ वर्षांहून अधिक काळ आपल्याकडे वेठबिगारी मजूर म्हणून अडकवून ठेवले होते . पती पत्नी अशा दोघांना आठवड्याला केवळ पाचशे रुपये मजुरीवर या मजुरांना हे सावकार राबवून घेत होते . त्याच बरोबर मजुरांना मारझोड तर महिलांवर अन्याय अत्याचार सारखे कृत्य देखील या सावकारांनी केल्याचे समोर आले आहे. या आदिवासी बांधवांवर येथील सावकारांकडून होणाऱ्या अन्यायाची दाहकता दैनिक लोकमतने सर्वांसमोर आणल्या नंतर वर्षानुवर्षे सावकाराच्या वेठबिगारीत अडकलेल्या आदिवासी बांधवांना दै लोकमतने धीर देत त्यांना अन्यायाविरोधात बोलते केले . त्यानंतर या सावकारांनी मागील अनेक वर्षांपासून आपल्यावर केलेल्या अन्यायाची आपबिती पोलिसांसमोर कथक केली असता वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांवर केलेल्या अन्यायाविरोधात दोघा सावकारांवर गणेशपुरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबरोबरच बंधबिगारी उच्चटन अधिनियम कलमांतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र हे दोघेही आरोपी अजूनही फरार असल्याने आम्हाला अजूनही खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही अशी प्रतिक्रिया बांधबिगरीतून मुक्त झालेल्या आदिवासी बांधवांनी दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी