शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 16:46 IST

दुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी. शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा.

ठळक मुद्देदुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी.शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तब्बल ३० तासांनंतर आल्याने वीजग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी.पी.सी.एल. पॉवर हाऊसशी निगडित असलेल्या कसारा ,वाशाळा सह काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेसाठी खडीत केलेला विज पुरवठा पूर्ववर्त् करण्यासाठी म. रा.वी.म व बि. पि. सी .एल कंम्पनीला अपयश आल्याने कसारा वासियांना तब्बल ३० तासांच्या ब्लॅकआऊटला समोरे जावे लागले.

सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामाला वॉशाळा सब सेंटरला सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाच्या हाय टेंशनच्या वायरी बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आले होते. परिणामी दुरुस्ती कामावेळी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना रात्री उशिरा पर्यंत दुरुस्ती कामात अपयश आल्याने रात्री ११ वाजता पडघा ,भिवंडी येथील कर्मचाऱ्यांना सब सेंटरला पाचरण करण्यात आले. परंतु रात्रीचा अंधार व पाऊस या मुळे म. रा.वी.म आणि बी.पी.सी.एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती मोहिमेत अडथळे निर्माण होत होते.

तज्ज्ञ अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कमावेळी रात्री एकच्या दरम्यान अचानक घाटघर वीज प्रकल्पातून येणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीत  तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले. रात्रभर काम करून देखील दुरुस्ती पूर्ववत न झाल्याने शनिवारी सकाळी घाटघर येथून येणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यात आली आणि शनिवारी दुपारी ३ वाजता कसाऱ्यासह अन्य भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्ब्ल ३० तासांनी वीज आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

२४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुकदरम्यान शुक्रवार सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामासाठी झटत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र २४ तास मेहनत घेत तब्बल ३० तासांनी वीजपुरवठा सुरळीत केला. या विशेष कामगिरीचे  वीजग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.

व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसानदरम्यान ३० तासाच्या ब्लॅकआउटमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः दुध, वैद्यकीय व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र