शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:26 IST

कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत

ठळक मुद्देसांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होतीस्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केलेया आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले.

नासीर कबीर

करमाळा :  सांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

घरदार सोडून जिवाची पर्वा न करता दहा  हजार पूरग्रस्तांना  स्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केले. या आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले. 

सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना  प्रथमत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे महत्वाचे काम  प्रशासनापुढे होते. करमाळा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मच्छीमारांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन करताच क्षणाचाही विलंब न लावता  स्वत:च्या बोटी घेऊन करमाळा तालुक्यातील  भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात  मासेमारी करणारे, पट्टीचे पोहणारे १९ युवक जीवावर उदार होऊन पाच दिवस मेहनत घेऊन दहा हजार पूरग्रस्तांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेले.

सांगली शहरातील विविध भागात पुराच्या पाण्यात अडकलेले वयोवृध्द,गंभीर आजारी,महिला,लहान मुले यांना  बोटीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम शिवाय दुमजली, तीनमजली इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचे काम  कंदर येथील रामभाऊ चव्हाण, धनाजी माने,शंकर माने,लखन चव्हाण,राहुल जाधव,सागर शिरतोडे, दशरथ बोडरे,संतोष माने,राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे,सखाराम माने,नागनाथ  माने ,सुग्रीव चमरे, नीलेश भोई, शिवाजी  चमरे, दयाराम चमरे,लहू भोई,संजय चमरे,कोंडिबा चंदर, सोमनाथ नगरे आदींनी केले.

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणलासांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

टॅग्स :SolapurसोलापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरfishermanमच्छीमार