शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:26 IST

कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत

ठळक मुद्देसांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होतीस्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केलेया आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले.

नासीर कबीर

करमाळा :  सांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

घरदार सोडून जिवाची पर्वा न करता दहा  हजार पूरग्रस्तांना  स्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केले. या आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले. 

सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना  प्रथमत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे महत्वाचे काम  प्रशासनापुढे होते. करमाळा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मच्छीमारांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन करताच क्षणाचाही विलंब न लावता  स्वत:च्या बोटी घेऊन करमाळा तालुक्यातील  भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात  मासेमारी करणारे, पट्टीचे पोहणारे १९ युवक जीवावर उदार होऊन पाच दिवस मेहनत घेऊन दहा हजार पूरग्रस्तांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेले.

सांगली शहरातील विविध भागात पुराच्या पाण्यात अडकलेले वयोवृध्द,गंभीर आजारी,महिला,लहान मुले यांना  बोटीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम शिवाय दुमजली, तीनमजली इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचे काम  कंदर येथील रामभाऊ चव्हाण, धनाजी माने,शंकर माने,लखन चव्हाण,राहुल जाधव,सागर शिरतोडे, दशरथ बोडरे,संतोष माने,राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे,सखाराम माने,नागनाथ  माने ,सुग्रीव चमरे, नीलेश भोई, शिवाजी  चमरे, दयाराम चमरे,लहू भोई,संजय चमरे,कोंडिबा चंदर, सोमनाथ नगरे आदींनी केले.

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणलासांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

टॅग्स :SolapurसोलापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरfishermanमच्छीमार