शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:26 IST

कंदरमधील ते १९ जण ठरले पूरग्रस्तांचे देवदूत; मच्छिमारांनी केली दहा हजार लोकांना मदत

ठळक मुद्देसांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होतीस्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केलेया आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले.

नासीर कबीर

करमाळा :  सांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

घरदार सोडून जिवाची पर्वा न करता दहा  हजार पूरग्रस्तांना  स्वत:च्या १२ बोटींतून  तब्बल  पाच दिवस अथक परिश्रम करून  सुरक्षित स्थळी नेण्याचे काम कंदरच्या १९ मच्छीमार बांधवांनी केले. या आपत्तीच्या काळात मदतीला जाणारे हे मच्छीमार बांधव पूरग्रस्त बांधवांसाठी देवदूतच ठरले. 

सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना  प्रथमत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे महत्वाचे काम  प्रशासनापुढे होते. करमाळा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मच्छीमारांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन करताच क्षणाचाही विलंब न लावता  स्वत:च्या बोटी घेऊन करमाळा तालुक्यातील  भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात  मासेमारी करणारे, पट्टीचे पोहणारे १९ युवक जीवावर उदार होऊन पाच दिवस मेहनत घेऊन दहा हजार पूरग्रस्तांना बोटीत बसवून सुरक्षित स्थळी नेले.

सांगली शहरातील विविध भागात पुराच्या पाण्यात अडकलेले वयोवृध्द,गंभीर आजारी,महिला,लहान मुले यांना  बोटीत बसवून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे काम शिवाय दुमजली, तीनमजली इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना जेवण,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याचे काम  कंदर येथील रामभाऊ चव्हाण, धनाजी माने,शंकर माने,लखन चव्हाण,राहुल जाधव,सागर शिरतोडे, दशरथ बोडरे,संतोष माने,राहुल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, धनाजी माने, बंडू बोडरे,सखाराम माने,नागनाथ  माने ,सुग्रीव चमरे, नीलेश भोई, शिवाजी  चमरे, दयाराम चमरे,लहू भोई,संजय चमरे,कोंडिबा चंदर, सोमनाथ नगरे आदींनी केले.

त्या ५० वर्षीय रामभाऊंनी चक्क मृतदेह पाठीवर घेऊन बाहेर आणलासांगलीत मदतकार्य  करणारे कंदर येथील पन्नासवर्षीय रामभाऊ चव्हाण यांनी पाण्यात वेढलेल्या इमारतीमधून शेकडो पूरग्रस्तांना चक्क पाठीवर बसवून बोटीत बसविले. एका ठिकाणी तर एका व्यक्तीचे निधन झाले होते ते उचलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. रामभाऊंनी  त्या मृतदेहास चक्क पाठीवर घेऊन बाहेर आणले व बोटीतून स्मशानभूमीत नेले.

टॅग्स :SolapurसोलापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरfishermanमच्छीमार