शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

राज्यात पुराने घेतले १४४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:22 IST

१५४ कोटींची मदत; मुख्य सचिवांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : महाराष्ट्रात जून ते ९ ऑगस्टपर्यंत ७८२ मि. मी. म्हणजे सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला असून पुरामुळे आतापर्यंत १४४ जणांचे बळी गेले. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १५४ कोटी रुपये वितरित केले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.पूरग्रस्तांना दिलेला निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरमध्ये सर्पदंशावरील १७ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या २० लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. ३० लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांची व्यवस्था केल्याचेही मेहता यांनी सांगितले.चार ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे सरासरीच्या १२४ टक्के तर सांगलीमध्ये सरासरीच्या २२३ टक्के आणि साताºयात सरासरीच्या १८१ टक्के पाऊस झाला. पुरामुळे सांगलीतील ९० आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २३९ गावे बाधित झाली आहेत. प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ८१३ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणची ३२ पथके कोल्हापूर, ८ पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. आवश्यक तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे मेहता यांनी सांगितले.एक लाख हेक्टरचे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर शेतीची जमीन बाधित झाली आहे. त्याची जिरायत, बागायती, फळबाग अशी फोड करण्यात येईल. पाणी ओसरल्यावर पीक विम्यापोटी नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी वीमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून पिकाचे नुकसान त्याचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ मिळू शकेल. आपत्तीग्रस्त नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना १५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर