शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:25 IST

दोन लाखांहून अधिक क्युसेक विसर्ग : आलमट्टीच्या पाण्यामुळे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

ठळक मुद्देविजयपूर, बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा,घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली सध्या कृष्णेत कल्लोळजवळ दूधगंगेतून ३३०८८ तर राजापूर जलाशयातून १ लाख ७२ हजार ३० क्युसेक असे एकूण २ लाख ५ हजार ११८ क्युसेक पाणी येत आहेआलमट्टी जलाशयाचा पाणीसाठा १२३.०८ पैकी १०३.७६ टीएमसी इतका झाला आहे. पाण्याची पातळी ५१९.६० मीटरपैकी ५१८.४१ मीटर इतकी झाली

विजयपूर : विजयपूर, बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, वेदगंगा, दूधगंगा व हिरण्यकेशी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, या नदीकाठावरील गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा आदेश विजयपूर-बागलकोट  प्रांताधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आला आहे. 

कृष्णा नदीकाठावरील  कोलार,बसवन बागेवाडी, मांजरी, येडूर, कल्लोळ, इंगळी या गावांना प्रांताधिकाºयांसह विविध अधिकाºयांनी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर  प्रांताधिकाºयांनी चिकपडलसगी, तिकोटा बबलेश्वर उपविभागातील महापुराचा या आधी फटका बसलेल्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिल्याने कृष्णा नदीकाठावरील नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे. 

सध्या कृष्णेत कल्लोळजवळ दूधगंगेतून ३३०८८ तर राजापूर जलाशयातून १ लाख ७२ हजार ३० क्युसेक असे एकूण २ लाख ५ हजार ११८ क्युसेक पाणी येत आहे. यामुळे संथ वाहणाºया कृष्णेने रौद्ररुप धारण केले आहे. आलमट्टी जलाशयात एकूण २ लाख २२ हजार ११३ क्युसेक पाणी येत आहे. तर २ लाख ३९ हजार ५२१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शनिवार रोजी आश्लेषा नक्षत्राचेही दमदार पावसाच्या वाढलेल्या या जोरामुळे २००५ प्रमाणे महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात शुक्रवारी-शनिवारदेखील पावसाचे वाढलेले प्रमाण कमी न झाल्याने विजयपूर, बागलकोट जिल्ह्यामधील नद्यांनी धोक्याच्या पातळीमध्ये शिरकाव केला आहे. 

आलमट्टी जलाशयाचा पाणीसाठा १२३.०८ पैकी १०३.७६ टीएमसी इतका झाला आहे. पाण्याची पातळी ५१९.६० मीटरपैकी ५१८.४१ मीटर इतकी झाली आहे. आलमट्टी जलाशयात २ लाख ५ हजार ८३२ क्युसेक पाण्याची आवक होत असून जलाशयातून २ लाख ३० हजार २०७ क्युसेक पाण्याचा २६ दरवाजांमधून विसर्ग होत आहे. 

दरम्यान, विजयपूर जिल्हा प्रशासनातर्फे महापुराच्या प्रसंगावर मात करण्यासाठी आरडीएफच्या (जलद कृतीदल) तुकड्यांसह जलतरणपटू, होड्या याशिवाय नदीकाठी २३ बोटींची व्यवस्था केली आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळfloodपूर