शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

सावधान! महाराष्ट्रात होतेय रोज २८ जणांचे अपहरण; सरकारी आकडेवारीतून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 07:11 IST

घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक घटना

चंद्रकांत दडसमुंबई : लग्न, लैंगिक छळ करण्यासाठी, पालकांनी शिव्या दिल्यामुळे घर सोडणे आणि प्रेम प्रकरणासह इतर घटनांमध्येे अपहरण होण्याच्या घटनांत देशात वाढ झाली आहे. देशात मुलींचे अपहरण सर्वाधिक होत असून, यातही २० वर्षांच्या आसपास वय असलेल्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रोज २८ जणांचे तर देशात २७८ हून अधिक जणांचे अपहरण होत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

देशात रोज ८६ पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार!२०२१ मध्ये देशभरात एकूण ३१,६७७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज सरासरी ८६ हून अधिक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. २०२० च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे १३ टक्के वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये बलात्काराची सर्वाधिक ६,३३७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. राजस्थाननंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसामचा क्रमांक लागतो.

दररोज ८० हून अधिक खून२०२१ मध्ये देशात एकूण २९,२७२ हत्या झाल्या. म्हणजेच देशात दररोज ८० हून अधिक हत्या झाल्या. २०२० च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये ०.३ टक्के वाढ झाली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खुनाच्या घटना घडतात. २०२१ मध्ये येथे एकूण ३,७१७ हत्या झाल्या. यानंतर बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. या प्रकारांंना आवर घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 

काय सांगतो अहवाल?अहवालानुसार, २०२१ मध्ये देशात गुन्हेगारी घटनांमध्ये ७.६ टक्के घट झाली असली तरीही खून, अपहरण, महिला, बालकांवरील गुन्हे वाढले आहेत. देशात अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये देशभरात एकूण १,०१,७०७ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज २७८ हून अधिक अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्के वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपहरणाच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अपहरणाची १०,५०२ प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रानंतर बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अपहरणाची नोंद झाली आहे.

बालगुन्हेगारीत वाढमध्य प्रदेशात लहान मुलांविरुद्धच्या सर्वाधिक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये लहान मुलांविरोधातील एकूण १९,१७३ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात एकूण १७,२६१ बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली.