शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

सावधान! महाराष्ट्रात होतेय रोज २८ जणांचे अपहरण; सरकारी आकडेवारीतून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 07:11 IST

घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक घटना

चंद्रकांत दडसमुंबई : लग्न, लैंगिक छळ करण्यासाठी, पालकांनी शिव्या दिल्यामुळे घर सोडणे आणि प्रेम प्रकरणासह इतर घटनांमध्येे अपहरण होण्याच्या घटनांत देशात वाढ झाली आहे. देशात मुलींचे अपहरण सर्वाधिक होत असून, यातही २० वर्षांच्या आसपास वय असलेल्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रोज २८ जणांचे तर देशात २७८ हून अधिक जणांचे अपहरण होत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

देशात रोज ८६ पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार!२०२१ मध्ये देशभरात एकूण ३१,६७७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज सरासरी ८६ हून अधिक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. २०२० च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे १३ टक्के वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये बलात्काराची सर्वाधिक ६,३३७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. राजस्थाननंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसामचा क्रमांक लागतो.

दररोज ८० हून अधिक खून२०२१ मध्ये देशात एकूण २९,२७२ हत्या झाल्या. म्हणजेच देशात दररोज ८० हून अधिक हत्या झाल्या. २०२० च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये ०.३ टक्के वाढ झाली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खुनाच्या घटना घडतात. २०२१ मध्ये येथे एकूण ३,७१७ हत्या झाल्या. यानंतर बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. या प्रकारांंना आवर घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 

काय सांगतो अहवाल?अहवालानुसार, २०२१ मध्ये देशात गुन्हेगारी घटनांमध्ये ७.६ टक्के घट झाली असली तरीही खून, अपहरण, महिला, बालकांवरील गुन्हे वाढले आहेत. देशात अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये देशभरात एकूण १,०१,७०७ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज २७८ हून अधिक अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्के वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपहरणाच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अपहरणाची १०,५०२ प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रानंतर बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अपहरणाची नोंद झाली आहे.

बालगुन्हेगारीत वाढमध्य प्रदेशात लहान मुलांविरुद्धच्या सर्वाधिक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये लहान मुलांविरोधातील एकूण १९,१७३ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात एकूण १७,२६१ बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली.