शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सावधान! महाराष्ट्रात होतेय रोज २८ जणांचे अपहरण; सरकारी आकडेवारीतून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 07:11 IST

घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक घटना

चंद्रकांत दडसमुंबई : लग्न, लैंगिक छळ करण्यासाठी, पालकांनी शिव्या दिल्यामुळे घर सोडणे आणि प्रेम प्रकरणासह इतर घटनांमध्येे अपहरण होण्याच्या घटनांत देशात वाढ झाली आहे. देशात मुलींचे अपहरण सर्वाधिक होत असून, यातही २० वर्षांच्या आसपास वय असलेल्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रोज २८ जणांचे तर देशात २७८ हून अधिक जणांचे अपहरण होत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

देशात रोज ८६ पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार!२०२१ मध्ये देशभरात एकूण ३१,६७७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज सरासरी ८६ हून अधिक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. २०२० च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे १३ टक्के वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये बलात्काराची सर्वाधिक ६,३३७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. राजस्थाननंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसामचा क्रमांक लागतो.

दररोज ८० हून अधिक खून२०२१ मध्ये देशात एकूण २९,२७२ हत्या झाल्या. म्हणजेच देशात दररोज ८० हून अधिक हत्या झाल्या. २०२० च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये ०.३ टक्के वाढ झाली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खुनाच्या घटना घडतात. २०२१ मध्ये येथे एकूण ३,७१७ हत्या झाल्या. यानंतर बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. या प्रकारांंना आवर घालण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 

काय सांगतो अहवाल?अहवालानुसार, २०२१ मध्ये देशात गुन्हेगारी घटनांमध्ये ७.६ टक्के घट झाली असली तरीही खून, अपहरण, महिला, बालकांवरील गुन्हे वाढले आहेत. देशात अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये देशभरात एकूण १,०१,७०७ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. म्हणजेच दररोज २७८ हून अधिक अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत अपहरणाच्या घटनांमध्ये १९.९ टक्के वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपहरणाच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अपहरणाची १०,५०२ प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्रानंतर बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अपहरणाची नोंद झाली आहे.

बालगुन्हेगारीत वाढमध्य प्रदेशात लहान मुलांविरुद्धच्या सर्वाधिक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये लहान मुलांविरोधातील एकूण १९,१७३ गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात एकूण १७,२६१ बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली.