शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार

By राजाराम लोंढे | Updated: February 8, 2023 13:18 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वरवर शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेती व त्याअनुषंगीक घटकांच्या तरतुदींना मोठ्या प्रमाणात कात्री लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २६ हजार कोटी शेती व शेतकऱ्यांच्या योजनांना कमी केले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली असून, त्याचे परिणाम भविष्यात शेती व शेतकऱ्यांवर होणार हे निश्चित आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मध्यमवर्गीय दिलासा देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी व शेतीसाठी काहीसा चिंताजनकच म्हणावा लागेल. शेती व शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या तरतुदीला २६ हजार कोटीची कात्री लावली आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद ३१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार राबवत असते. कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे ३२८३ कोटी रुपये कमी केले आहेत.‘मनरेगा’ची १८ टक्क्यांनी तरतूद कमीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. बेरोजगार व गरजूंना या योजनेचा मोठा आधार असतो. मात्र, केंद्र सरकारने या योजनेचे बजेट १३ हजार काेटीने कमी केल्याने त्याचा फटका बसणार आहे.‘पी. एम. किसान’लाही लावली कात्रीप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यासाठी मागील अर्थसंकल्पात ६८ हजार काेटींची तरतूद केली होती, या अर्थसंकल्पात ६० हजार कोटींपर्यंत खाली आणली आहे.शेतीसाठी केलेल्या तुलनात्मक तरतुदी :योजना                              २०२२-२३                    २०२३-२४प्रधानमंत्री पीक विमा       १५ हजार ५०० कोटी       १३ हजार ६२५ कोटी‘पीएम किसान’               ६८ हजार कोटी              ६० हजार कोटी‘मनरेगा’                        ७३ हजार कोटी               ६० हजार कोटीराष्ट्रीय कृषी विकास       १० हजार ४३३ कोटी        ७ हजार १५० कोटीकृषिन्नोती                      ७ हजार १८३ कोटी          ७ हजार ६६ कोटी

अर्थसंकल्पातील विभागनिहाय केलेल्या तरतुदी :दूरसंचार : १.२७ लाख कोटीकृषी व शेतकरी कल्याण : १.२५ कोटीग्रामविकास : १.६० कोटीरसायने व खते : १.७८ कोटीगृहमंत्रालय : १.९६ कोटीउपभोक्ता अन्न सार्वजनिक वितरण : २.०६ कोटीरेल्वे मंत्रालय : २.४१ कोटीरस्ते वाहतूक व महामार्ग : २.४१ कोटीसंरक्षण : ५.९४ कोटी

एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हीच काहीतरी करतो, हे भासवण्याचे काम केंद्र सरकार करत असले तरी कृषी योजनांच्या पैशाला कात्री लावली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आहे. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी संघटना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2023Farmerशेतकरी