शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार

By राजाराम लोंढे | Updated: February 8, 2023 13:18 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वरवर शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेती व त्याअनुषंगीक घटकांच्या तरतुदींना मोठ्या प्रमाणात कात्री लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २६ हजार कोटी शेती व शेतकऱ्यांच्या योजनांना कमी केले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली असून, त्याचे परिणाम भविष्यात शेती व शेतकऱ्यांवर होणार हे निश्चित आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मध्यमवर्गीय दिलासा देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी व शेतीसाठी काहीसा चिंताजनकच म्हणावा लागेल. शेती व शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या तरतुदीला २६ हजार कोटीची कात्री लावली आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद ३१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार राबवत असते. कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे ३२८३ कोटी रुपये कमी केले आहेत.‘मनरेगा’ची १८ टक्क्यांनी तरतूद कमीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. बेरोजगार व गरजूंना या योजनेचा मोठा आधार असतो. मात्र, केंद्र सरकारने या योजनेचे बजेट १३ हजार काेटीने कमी केल्याने त्याचा फटका बसणार आहे.‘पी. एम. किसान’लाही लावली कात्रीप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यासाठी मागील अर्थसंकल्पात ६८ हजार काेटींची तरतूद केली होती, या अर्थसंकल्पात ६० हजार कोटींपर्यंत खाली आणली आहे.शेतीसाठी केलेल्या तुलनात्मक तरतुदी :योजना                              २०२२-२३                    २०२३-२४प्रधानमंत्री पीक विमा       १५ हजार ५०० कोटी       १३ हजार ६२५ कोटी‘पीएम किसान’               ६८ हजार कोटी              ६० हजार कोटी‘मनरेगा’                        ७३ हजार कोटी               ६० हजार कोटीराष्ट्रीय कृषी विकास       १० हजार ४३३ कोटी        ७ हजार १५० कोटीकृषिन्नोती                      ७ हजार १८३ कोटी          ७ हजार ६६ कोटी

अर्थसंकल्पातील विभागनिहाय केलेल्या तरतुदी :दूरसंचार : १.२७ लाख कोटीकृषी व शेतकरी कल्याण : १.२५ कोटीग्रामविकास : १.६० कोटीरसायने व खते : १.७८ कोटीगृहमंत्रालय : १.९६ कोटीउपभोक्ता अन्न सार्वजनिक वितरण : २.०६ कोटीरेल्वे मंत्रालय : २.४१ कोटीरस्ते वाहतूक व महामार्ग : २.४१ कोटीसंरक्षण : ५.९४ कोटी

एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हीच काहीतरी करतो, हे भासवण्याचे काम केंद्र सरकार करत असले तरी कृषी योजनांच्या पैशाला कात्री लावली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आहे. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी संघटना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2023Farmerशेतकरी