शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सतर्क, नाराज आमदारांवर ‘वॉच’; भाजपाच्या दाव्यानंतर राजकीय हालचाल वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:46 IST

सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

अल्पेश करकरे

मुंबई - राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार  पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी तिन्ही पक्षाकडून सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आश्वस्त करण्यात येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे मोहरे फोडून दाखवा असं विरोधी पक्षाला आव्हान केलं होतं. ते आव्हान  केंद्रीय मंत्री व भाजपा वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosahe Danve) यांनी स्वीकारलं असल्याचे चर्चा आहे. कारण रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलंय.

उद्धव ठाकरेंनी विरोधकांना काय आव्हान दिले होते?

सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं, ते पिलू वळवळ करत होतं, आता फुत्कारत आहे, असं म्हणत भाजपला उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. महाराष्ट्र सरकार पडणार नाही. आपले १७० आमदार आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) ३ मार्च रोजी मुंबईत बोलताना व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. परंतु माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना केलं होतं. तसेच ते तुमची गुमालगिरी करणार नाहीत, असं ही त्यांनी म्हटलं होतं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान केलं होतं.

रावसाहेब दानवे यांनी काय गौप्यस्फोट केला ?

भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे."महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या(BJP) वाघोरीत येऊन पडतील" असं धक्कादायक विधान दानवे यांनी केलं आहे. दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी २५ आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. "जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत" असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला.

कोण नाराज चाचपणी सुरू ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट या पार्श्वभूमीवर  खरच त्यांच्या वक्तव्यानुसार आमदार फोडले तर नाही ना.. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षश्रेष्ठी आपल्या आमदारांची फोन करून विचारपूस करत असल्याची चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांचा हा दावा खरा की खोटा, पण त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची चिंता वाढली आहे. सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या दाव्यामुळे सरकार धास्तावले

यापूर्वीही अनेकदा भाजप नेत्यांकडून सरकार पडणार अशी अनेक वक्तव्य आपण वारंवार ऐकली आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सरकारला अनेक मुद्द्यांवर विरोधक कोंडीत पकडताना दिसत आहेत . त्यामुळे सरकार कुठेतरी अनेक मुद्यांवरून डगमगलेले असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार विविध मुद्द्यांवरून  आपल्याच सरकारवर नाराज असल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सरकार धास्तावल्याचं देखील चर्चा आहे.

दानवे यांचा खरच गौप्यस्फोट की फक्त चर्चा ?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच काही ना काही विषयांवरून चर्चेत असतात. त्यामध्ये नुकतच त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्यावरून राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र दुसरीकडे दानवे यांनी खरंच गौप्यस्फोट केलाय की फक्त चर्चा घडवण्यासाठी वक्तव्य केले असल्याची देखील चर्चा सुरू आहे. कारण अधिवेशन सुरू आहे, तसेच दुसरीकडे तीन दिवस होळी आणि सुट्ट्यांचा काळ आहे, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी तर हे विधान केलं नाही ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.त्यामुळे दानवे यांनी जो गौप्यस्फोट केलाय तो खरा की खोटा हे पुढील काळातच स्पष्ट होईल.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीraosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा