शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:22 AM

जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला

मुंबई : जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला. मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरला बॅरेज धरणाखालच्या ओढ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा; तर नवी मुंबईत खारघरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला.मुंबई शहरापेक्षा उपनगरात आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात दिवसभर मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत झाले. उपनगरी गाड्यांची वाहतूक, रस्ते वाहतूक मंदावली. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. चेंबूरमध्ये घराच्या छताचा काही भाग कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी पडलेल्या दमदार पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला.दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची एक लेन अद्याप बंद असून दोन लेनवरूनच वाहतूक सुरू आहे. संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, पनवेलजवळील कर्नाळा खिंडीतील वाहतूक मंदावली होती. महाडजवळ चौपदरीकरणाचे काम पावसामुळे बंद आहे. पण खोदकामामुळे मातीचा भराव रस्त्यावर येत असल्याने दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेसाठी काही धोकादायक वळणावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.बदलापूरच्या बॅरेज धरणाच्या ओढ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्याचे नाव गोपाळ दास (वय २०) असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली.खारघरमध्ये तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात फैयान खान (वय १९), रियान खान (वय १९) आणि अबिद सिद्दिकी (वय ३६) यांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही तळोजा वसाहतीत राहणारे आहेत. पावसाने तलावात पाणी साचल्याने ते पोहण्यास उतरले, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. पांडवकडा धबधब्यावर प्रवेशबंदी असल्याने अनेकजण आसपासच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात उतरत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. बुडालेल्या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून अग्नीशमन दलाचे जवान उरलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.मुंबई शहर, उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी वरुणराजाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर, संध्याकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच होता.पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरीवली, गोरेगांव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात मात्र पावसाचा जोर दिवसभर काहीसा कमी होता. पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत होते. चेंबूरच्या विश्व गौतमनगर वसाहतीतील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याने शिवाजी कळके हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.कुलाब्यात रविवारी संध्याकाळपर्यंत १२.०४ मिमी, तर सांताक्रुझमध्ये ८४.०३ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने आणि सुट्टीचा दिवस असल्याने, पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला जास्त प्रमाणात बसला नाही. पण वाहतूक विस्कळीतच होती. रस्त्यावरील वाहतूकही संथ गतीने सरकत होती. पुढचे २४ तास पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सोमवारी याचा फटका रेल्वे, वाहतुकीला बसण्याची भीती आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत शॉर्टसर्किट आणि झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या. शहरात ५, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा नऊ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली, तसेच शहरात एकूण १७ ठिकाणी झाडे किंवा झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, यातही कोणाला दुखापत झाली नाही. 

टॅग्स :Mumbai Rainमुंबईचा पाऊस