शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:11 IST

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत.

चंद्रकांत दडसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे, करीअरमध्ये भरारी  घेतली पाहिजे अशा गावगप्पा सारेच रंगवतात... पण ते प्रत्यक्षात येत नाही, याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील २२.१ टक्के मुलींचे लग्न २० वर्षांपूर्वीच आटोपले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही १.१ टक्के मुलींचे बालविवाह होत असून, त्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. शहरी भागात हेच प्रमाण १५.६ टक्के आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या २०२३ च्या नमुना नोंदणी प्रणाली  अहवालातून ही माहिती समोर आली  आहे. शहरी भागातील मुली ग्रामीण भागातील मुलींच्या तुलनेत उशिरा विवाह करतात. बहुतेक राज्यांमध्ये असेच दिसते. राष्ट्रीय स्तरावर मुलींचे विवाहाचे सरासरी वय २२.९ वर्षे आहे.  

राज्यटक्केवारी
प. बंगाल  ५१.२
झारखंड ४६.१
बिहार  ३८.३
आसाम ३६.०
ओडिशा२९.८
छत्तीसगड२९.२
मध्य प्रदेश२८.०
राजस्थान२४.१
महाराष्ट्र  २२.१
उत्तर प्रदेश१९.०

पश्चिम बंगाल (६.३%) आणि झारखंडमध्ये (४.६%) मुलींचे विवाह अजूनही कमी वयात होतात तर जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये विवाह उशिरा होतात. २१ वर्षे व त्याहून अधिक वयात विवाह करण्याचे प्रमाण सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये (९०.३%) तर हरयाणामध्ये ८६.१% इतके आहे. 

महाराष्ट्रात तरुणींचे १८ वर्षांपूर्वी  विवाह लावून देण्याचे प्रमाण १ टक्के आहे. १८-२० वर्षे वयोगटात २०.७% विवाह होत असून, २१ वर्षे व त्याहून अधिक वयात ७८.३% विवाह होत आहेत.

विभाग     १८ वर्षांपूर्वी (%)१८-२० वर्षे (%)२१ वर्षे व त्याहून अधिक (%)
भारत (एकूण)२.१ २५.०७२.९
ग्रामीण भाग२.५२८.१६९.४
शहरी भाग  १.२ १७.०८१.८
टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र