शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

२१४ कोळसा खाणपट्टे रद्द

By admin | Updated: September 25, 2014 05:13 IST

९९३ ते २०१० या काळात केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांना केलेले एकूण २१४ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले

२१४ कोळसा खाणपट्टे रद्दनवी दिल्ली : १९९३ ते २०१० या काळात केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी कंपन्यांना केलेले एकूण २१४ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केले. यापैकी ज्या ४० खाणपट्ट्यांमध्ये याआधीच उत्पादन सुरू झाले आहे त्यांना ते बंद करण्यासाठी सहा महिन्यांची म्हणजे ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत दिली गेली आहे. रद्द केल्या गेलेल्या खाणपट्ट्यांमध्ये विदर्भातील २४ खाणपट्ट्यांचा समावेश असून, त्यापैकी १० खाणपट्ट्यांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे.या काळात ‘स्क्रीनिंग कमिटी’च्या माध्यमातून व थेट सरकारकडून केले गेलेले एकूण २१८ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप ‘मनमानी आणि बेकायदा’ असल्याचा निकाल सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने २५ आॅगस्ट रोजी दिला होता. हे सर्व बेकायदा वाटप रद्द करावे. त्यामुळे होणारे परिणाम कितीही गंभीर असले तरी ते निस्तरण्याची आमची तयारी आहे, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिल्यानंतर त्याच खंडपीठाने हा खाणपट्टे रद्द करण्याचा आदेश दिला. मात्र रिलायन्स समूहाच्या सासन पॉवर लि. कंपनीच्या अतिविशाल औष्णिक वीज प्रकल्पासाठी दिलेले मोहेर आणि मोहेर अमरोली एक्स्टेंशन हे दोन खाणपट्टे तसेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळास दिलेला पाकरी बाखाडिह व स्टील अ‍ॅथॉरिटी अआॅप इंडियास दिलेला तसरा या चार खाणपट्ट्यांचे वाटप इतरांप्रमाणेच बेकायदा असूनही न्यायालयाने ते रद्द केले नाही. रद्द केल्या गेलेल्या खाणपट्ट्यांपैकी ४० खाणपट्टे असे आहेत जेथे उत्पादन सुरु झाले आहे किंवा उत्पादन सुरु होण्याच्या बेतात आहे. त्या खाणी बंद करण्यासाठी न्याायलयाने संबंधित कंपन्यांना येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात या खाणी ताब्यात घेऊन कोल इंडियाने त्या चालव्यात, अशी अपेक्षा आहे.ज्यांना खाणपट्टयांचे वाटप झाले त्यांनी तेथे वेळेत उत्पादन सुरु न केल्याने सरकारचे प्रत्येक टन कोळशामागे २९५ रुपयांचे नुसकान झाले, असा अंदाज नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) त्यांच्या अहवालात नोंदविला होता. त्यामुळे वाट झालेल्या खाणपट्ट्यांमध्ये ज्यांनी उत्पादन सुरु केले आहे त्यांनी आजवर काढलेल्या व ३१ मार्चपर्यंत काढल्या जाणाऱ्या कोळशावर अतिरिक्त लेव्हीपोटी प्रतिटन २९५ रुपये केंद्र सरकारला द्यावेत, असाही आदेश खंडपीठाने दिला. याची आत्तापर्यंतची थकबाकी ३१ डिसेंबरपर्यंत द्यायची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)