शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

पाच दिवसांत गॅस्ट्रोचे २०० रुग्ण

By admin | Updated: August 6, 2016 01:24 IST

मुसळधार पावसामुळे मुंबई थंडावली असली तरीही आजारांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई थंडावली असली तरीही आजारांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. सामान्यपणे जुलै महिन्यानंतर साथीचे आजार डोके वर काढू लागतात. डासांमुळे होणाऱ्या आजारांपेक्षा दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण यंदा वाढलेले दिसून येत आहे. १ ते ५ आॅगस्ट दरम्यान आढळलेल्या रुग्णांमध्येही दूषित पाणी आणि अन्नामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर काही भागात दूषित पाणी येते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून प्या, असे आवाहन मुंबईकरांना महापालिकेतर्फे करण्यात आले होते. पण तरीही दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ दिसून आली आहे. पाच दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे तब्बल २०० रुग्ण आढळून आले आहेत. हेपिटायटिसचे (ए, ई) १८ रुग्ण आढळून आले आहेत, तर टायफॉइडचे ५९ रुग्ण आढळून आले आहेत. या आजारांना टाळता येणे सहज शक्य आहे. पण या उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात योग्य ती काळजी घ्या आणि आजार टाळा, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे १५४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी काही प्रमाणात स्वाइन फ्लूने मुंबईत डोके वर काढले होते. . (प्रतिनिधी)>डासांमुळे आजारात वाढआॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचवेळी पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत.