शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पाच दिवसांत गॅस्ट्रोचे २०० रुग्ण

By admin | Updated: August 6, 2016 01:24 IST

मुसळधार पावसामुळे मुंबई थंडावली असली तरीही आजारांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई थंडावली असली तरीही आजारांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. सामान्यपणे जुलै महिन्यानंतर साथीचे आजार डोके वर काढू लागतात. डासांमुळे होणाऱ्या आजारांपेक्षा दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण यंदा वाढलेले दिसून येत आहे. १ ते ५ आॅगस्ट दरम्यान आढळलेल्या रुग्णांमध्येही दूषित पाणी आणि अन्नामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर काही भागात दूषित पाणी येते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून प्या, असे आवाहन मुंबईकरांना महापालिकेतर्फे करण्यात आले होते. पण तरीही दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ दिसून आली आहे. पाच दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे तब्बल २०० रुग्ण आढळून आले आहेत. हेपिटायटिसचे (ए, ई) १८ रुग्ण आढळून आले आहेत, तर टायफॉइडचे ५९ रुग्ण आढळून आले आहेत. या आजारांना टाळता येणे सहज शक्य आहे. पण या उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात योग्य ती काळजी घ्या आणि आजार टाळा, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे १५४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी काही प्रमाणात स्वाइन फ्लूने मुंबईत डोके वर काढले होते. . (प्रतिनिधी)>डासांमुळे आजारात वाढआॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचवेळी पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत.