शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:11 IST

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून  गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास  ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २०  हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून याचे श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले.

ठळक मुद्दे७५ तालुक्यातील हजारो गावात ग्रामस्थांनी केले श्रमदानदुष्काळाशी दोन हात केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन

सांगली :  राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून  गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास  ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. या वर्षी जवळपास ६००० गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीपर्यंत राज्यातील जवळपास २०  हजार गावे दुष्काळ मुक्त झालेली असतील, असा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून याचे श्रेय त्यांनी जनसहभागाला दिले.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंढी आणि बागलवाडी येथे पाणी फौंडेशन अंतर्गत जलसंधारण कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली, तिला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत, कसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एखाद्या योजनेत जनआंदोलन होत नाही, लोकसहभागातून ती जनतेची योजना होत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना जनतेची योजना केली, तिला अमीर खान यांच्या वॉटर कपची साथ मिळाली.

या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावी ग्रामस्थांनी एकच ध्यास घेऊन श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला. याच मंत्राच्या आधारावर ७५ तालुक्यातील हजारो गावे झपाटून, एकच ध्यास घेऊन काम करतायत, कसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दुष्काळाचे आव्हान स्वीकारून, दुष्काळाशी दोन हात केले व त्याला पराभूत केले, याबद्दल जनसहभागाचे अभिनंदन केले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे, असे ते म्हणाले.बागलवाडीत या स्पर्धेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावात असलेल्या महिलाराजला दिले. तरुण आणि माता भगिनींनी प्रामाणिकपणे, सचोटीने वेळेच्या आत काम केल्याबद्दल अभिनंदन केले.फडणवीस म्हणाले की,  दोन ते तीन  वर्षांपूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जल संधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होऊ लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचा प्रत्यय बागलवाडी ग्रामस्थांनी मला दिला.

या माध्यमातून प्रत्येकाचा धर्म, जात, पक्ष, गट हा पाणी झाला आहे. पाण्याच्या या कामामुळे लोक एकत्र येऊन गाव बदलायचे काम करत आहेत, याचे श्रेय वॉटर कप स्पर्धेला आहे.त्यांच्यासोबत पाणी फौंडेशनचे अविनाश पोळ यांच्यासह आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, प्रभारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी डॉ. खोत, उपविभागीय पोलिस अधिकारी वाकुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी चिल्लळ, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गुणाले आदी उपस्थित होते.

फडणवीस यांचे आवंढी येथे उत्स्फूर्त स्वागत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जत तालुक्यातील आवंढी येथे हेलिपॅडवर मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील आदि उपस्थित होते.

बागलवाडी ग्रामस्थांचे कौतुक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्न बागलवाडी ग्रामस्थांचे कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलोय. तीन ते साडेतीन  वर्षांपूर्वी राज्यात  ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतच, पण त्याच बरोबर विकेंद्रित पद्धतीने पाणलोटाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीcollectorतहसीलदारWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी