शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कर्जमाफीसाठी २ लाख शेतकरी करणार जेल भरो! १४ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:19 IST

संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी, राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने सर्वच मागण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, सुकाणू समितीने १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रहाची हाक दिली आहे.

मुंबई - संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी, राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने सर्वच मागण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, सुकाणू समितीने १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रहाची हाक दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने हा इशारा दिला आहे.समितीचे सदस्य किशोर ढमाले म्हणाले की, बेळगावासह राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये शेतकरी जागर यात्रा काढत, सुकाणू समितीने सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारला आहे. वीजबिलावर बहिष्कार टाकत शेतकºयांनी अन्यत्याग आंदोलन केले. त्यानंतरही सरकारला जाग आलेली नसून, शेतकºयांची दिशाभूल करण्यात सरकार धन्यता मानत आहे. म्हणूनच १४ मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी जेल भरो आंदोलन करतील. त्यासाठी हजारो शेतकºयांनी संमतीपत्रके भरून दिलेली आहेत.ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा करून, सरकार शेतकºयांकडून दीड लाखांपुढची कर्ज वसूल करून स्वत:चीच तिजोरी भरत आहे. अद्याप कर्जमाफीची ३४ हजार कोटींची रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात आलेली नाही. दुधाच्या दराबाबत जूनमध्ये शासन निर्णय जारी केल्यानंतरही, दुधाला प्रती लीटरसाठी २७ रुपये दर मिळालेला नाही. दुधाला दर न देणाºया संघांवर कारवाई करण्याऐवजी सरकारकडून अनुदान देण्याचा प्रकार सुरू आहे.वीजबिलाबाबतही सरकारी कंपनीच सरकारची लूट करत असल्याचा आरोप समितीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी केला आहे. होगाडे म्हणाले की, या संदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केलेले आहेत, तरीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे शेतकºयांनी संपूर्ण वीजबिल माफी मिळत नाही, तोपर्यंत बिल न भरण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तूर्तास तरी शासनाने वीजबिलाचा प्रश्न आॅगस्ट महिन्यांपर्यंत सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.जेल भरोला कामगार संघटनांचा पाठिंबाकामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विश्वास उटगी यांनी शेतकºयांच्या जेल भरो आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत ७० टक्क्यांपर्यंत वाटा असलेल्या शेतकरी आणि कामगार यांना नष्ट करण्याचे काम सरकारी धोरण करत आहे. त्यामुळे सत्ता उलथविण्याचे काम शेतकरी आणि कामगार मिळून करतील, असेही ते म्हणाले....म्हणून विरोधी पक्षांचे मौन!दूध, ऊस किंवा तूर डाळीला भाव मिळत नसतानाही विरोधी पक्ष चुप्पी साधून आहेत. कारण साखर कारखाना, बाजार समित्या आणि दूध संघांवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपाचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा पवित्रा सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांनी घेतल्याचा आरोप समितीने केला आहे. मात्र, दुधासह शेतीमालाला हमीभाव मिळविण्यासाठी डाव्या पक्षांसह, सर्व शेतकरी संघटना १४ मे रोजी राज्यातील सर्व तुरुंग भरतील, असा दावा सुकाणू समितीने केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र