शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कर्जमाफीसाठी २ लाख शेतकरी करणार जेल भरो! १४ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:19 IST

संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी, राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने सर्वच मागण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, सुकाणू समितीने १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रहाची हाक दिली आहे.

मुंबई - संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य भाव, शेतमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी, राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने सर्वच मागण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, सुकाणू समितीने १४ मे रोजी राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रहाची हाक दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने हा इशारा दिला आहे.समितीचे सदस्य किशोर ढमाले म्हणाले की, बेळगावासह राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये शेतकरी जागर यात्रा काढत, सुकाणू समितीने सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारला आहे. वीजबिलावर बहिष्कार टाकत शेतकºयांनी अन्यत्याग आंदोलन केले. त्यानंतरही सरकारला जाग आलेली नसून, शेतकºयांची दिशाभूल करण्यात सरकार धन्यता मानत आहे. म्हणूनच १४ मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी जेल भरो आंदोलन करतील. त्यासाठी हजारो शेतकºयांनी संमतीपत्रके भरून दिलेली आहेत.ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा करून, सरकार शेतकºयांकडून दीड लाखांपुढची कर्ज वसूल करून स्वत:चीच तिजोरी भरत आहे. अद्याप कर्जमाफीची ३४ हजार कोटींची रक्कम कर्जमाफीसाठी वापरण्यात आलेली नाही. दुधाच्या दराबाबत जूनमध्ये शासन निर्णय जारी केल्यानंतरही, दुधाला प्रती लीटरसाठी २७ रुपये दर मिळालेला नाही. दुधाला दर न देणाºया संघांवर कारवाई करण्याऐवजी सरकारकडून अनुदान देण्याचा प्रकार सुरू आहे.वीजबिलाबाबतही सरकारी कंपनीच सरकारची लूट करत असल्याचा आरोप समितीचे सदस्य प्रताप होगाडे यांनी केला आहे. होगाडे म्हणाले की, या संदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केलेले आहेत, तरीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे शेतकºयांनी संपूर्ण वीजबिल माफी मिळत नाही, तोपर्यंत बिल न भरण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तूर्तास तरी शासनाने वीजबिलाचा प्रश्न आॅगस्ट महिन्यांपर्यंत सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.जेल भरोला कामगार संघटनांचा पाठिंबाकामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विश्वास उटगी यांनी शेतकºयांच्या जेल भरो आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत ७० टक्क्यांपर्यंत वाटा असलेल्या शेतकरी आणि कामगार यांना नष्ट करण्याचे काम सरकारी धोरण करत आहे. त्यामुळे सत्ता उलथविण्याचे काम शेतकरी आणि कामगार मिळून करतील, असेही ते म्हणाले....म्हणून विरोधी पक्षांचे मौन!दूध, ऊस किंवा तूर डाळीला भाव मिळत नसतानाही विरोधी पक्ष चुप्पी साधून आहेत. कारण साखर कारखाना, बाजार समित्या आणि दूध संघांवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपाचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा पवित्रा सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांनी घेतल्याचा आरोप समितीने केला आहे. मात्र, दुधासह शेतीमालाला हमीभाव मिळविण्यासाठी डाव्या पक्षांसह, सर्व शेतकरी संघटना १४ मे रोजी राज्यातील सर्व तुरुंग भरतील, असा दावा सुकाणू समितीने केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र