शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:06 IST

Lok Sabha Elections 2024 : काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे. 

अमरावती : देशात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यातच अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे. 

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असे बच्चू कडू म्हणाले. २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची, असा टोला राणा दाम्पत्याला लगावत १७ रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, १७ रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राणा दाम्पत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र या साड्या पाहून तेथील आदिवासी महिला चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला होता. तसेच, या साड्या वाटपावरून मेळघाटामध्ये चांगलंच वातावरण तापले होते. त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे. 

नवनीत राणांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारीअमरावती लोकसभेसाठी नववीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच केली होती. पण भाजपने नववीत राणांना संधी दिली. त्यामुळे महायुतीत असलेले बच्चू कडू नाराज झाले. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुनाच असून एकमेकांच्यात विस्तवही जात नसल्याची परिस्थिती आहे. त्याचमुळे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली. दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले आहे. तसेच, या जागेवर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे देखील इच्छुक होते. पण, ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ देखील नाराज आहेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४