शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

१९ शासकीय आश्रमशाळांचा गुंडाळला गाशा

By admin | Updated: September 4, 2014 00:52 IST

आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचे समायोजन : १४ पूर्णपणे बंद तर ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंददिगांबर जवादे - गडचिरोलीआदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. यातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पटसंख्येअभावी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने राज्यात ५४७ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांंमध्ये सध्यास्थितीत ३ लाख ९८ हजार ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एके काळी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने या आश्रमशाळांच्या देखभालीकडे आदिवासी विकास विभागाचे व शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक आश्रमशाळा जीर्ण इमारतीमध्येच भरविल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागते. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचा सर्प व कीटकांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. त्यामुळे कोसोदूर असलेल्या आश्रमशाळेमध्ये आपल्या मुलाला पाठविण्यास पालकवर्ग तयार होत नाही. परिणामी आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. बराचशा आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ४ ते ५ विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतला आहे. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च शासनाला करणे परवडत नसल्याने नागपूर विभागातील सुमारे १९ शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहेरी, देवरी, चिमुर, चंद्रपूर, गडचिरोली या प्रकल्पांमधील १४ आश्रमशाळांचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ शाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शासनाने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची फार मोठी ससेहोलपट झाली आहे. एवढ्या शाळा बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यातही आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.