शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

१९ शासकीय आश्रमशाळांचा गुंडाळला गाशा

By admin | Updated: September 4, 2014 00:52 IST

आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचे समायोजन : १४ पूर्णपणे बंद तर ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंददिगांबर जवादे - गडचिरोलीआदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. यातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पटसंख्येअभावी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने राज्यात ५४७ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांंमध्ये सध्यास्थितीत ३ लाख ९८ हजार ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एके काळी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने या आश्रमशाळांच्या देखभालीकडे आदिवासी विकास विभागाचे व शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक आश्रमशाळा जीर्ण इमारतीमध्येच भरविल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागते. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचा सर्प व कीटकांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. त्यामुळे कोसोदूर असलेल्या आश्रमशाळेमध्ये आपल्या मुलाला पाठविण्यास पालकवर्ग तयार होत नाही. परिणामी आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. बराचशा आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ४ ते ५ विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतला आहे. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च शासनाला करणे परवडत नसल्याने नागपूर विभागातील सुमारे १९ शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहेरी, देवरी, चिमुर, चंद्रपूर, गडचिरोली या प्रकल्पांमधील १४ आश्रमशाळांचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ शाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शासनाने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची फार मोठी ससेहोलपट झाली आहे. एवढ्या शाळा बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यातही आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.