शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पश्चिम विदर्भातील ५०१ प्रकल्पांत १८.५५ टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:07 IST

पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

-संदीप मानकर अमरावती - पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, एप्रिल ते जून असे तीन महिने प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २०.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत २४.२४ टक्के आणि ४६९ लघुप्रकल्पांत १२.५८ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. ५०१ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ६११.१२ दलघमी शिल्लक आहे. विभागातील अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत २२.४० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सरासरी २५.५२ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १७.४९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ११.२ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सर्वात कमी ५.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

आठ मोठ्या प्रकल्पांची पाणीसाठा स्थितीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत २०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३३.३२ टक्के, अरुणावती प्रकल्पात १९.९३ टक्के, बेंबळा प्रकल्पात २३.८५ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २०.४७ टक्के, वान प्रकल्पात सर्वाधिक ४०.७७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ९.९७ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ०.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची झळ आतापासून जाणवू लागली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई