शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटी, राज्यातील अन्य प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 21:27 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले.

नवी दिल्ली, दि. 1 - मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील अन्य महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले. तसेच मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटींची तरतुदीची घोषणा करण्यात आली.  या बैठकीला  खासदार चंद्रकांत खैरे, खासदार धनंजय महाडीक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. नितीन गडकरींसोबत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेले महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे-  कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्प. - २ हजार कोटी रूपये खर्च येईल. - पहिले ५०० कोटीचे टेंडर काढले जातील. - १ हजार कोटी केंद्र सरकार आणि १ हजार कोटी महापालिका खर्च करेल.  २५ हजार कोटींच्या कामांचा आढावा घेतला.- मुंबई-गोवा रस्ता १८ हजार कोटींचा. - ६० टक्के भू संपादन झाले नाही. स्ट्रक्चरल काम सुरू केले.- औरंगाबाद - जालना (अंजिठा) रस्ता. कामाला मंजूरी दिली- सातारा- कागल-कोल्हापूर ६ लेन करायचा आहे. - मार्ग काढून ३ हजार कोटी देण्याचा निर्णय . टेंडर १ महिन्यात काढू. - ३ महिन्यात काम सुरू करू. - जालना चिखली चौपदरीकरणकरण करणार.- ठाणे भिवंडी एनएचएआय करणार - ठाणे भिवंडी बायपास (नाशिक) ८ लेन करणार. - १ हजार कोटींचे टेंडर निघेल.- १ महिन्यात काम सुरू होईल. - महाराष्ट्र - मध्य प्रदेश राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे.- दोन्ही पैकी पैकी एकच राज्य डीपीआर करेल.- यापूर्वी दोन राज्य डीपीआर बनवत असे.- दोन राज्यांनी डीपीआरचे काम हाती घेतल्यामुळे उशीर होत असे- सर्वच राज्याकरिता नियम असेल. कल्याण-ठाणे जलवाहतुकीचा मार्ग मोकळा ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला मंजुरी मिळावी, यासाठी शिंदे आणि विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी गडकरी यांच्यासमोर केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भार्इंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा-भार्इंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास तयारी दर्शविली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी