शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 12, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असून त्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या टंचाईचा हा अहवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला.नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या या बैठकीला आमदार, खासदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बोरसे आदींसह महापालिकांचे प्रतिनिधी, विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. महापालिकांसह ग्रामीण व दुर्गम भागातील टंचाईसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. पाणीसमस्या तत्काळ दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. धरणांच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी बैठकीमध्ये टंचाई कमी झाल्याचा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सांगितले.धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आधीच कपात सुरू करण्यात आली आहे. पण, या कपातीच्या नावाखाली बहुतांशी ठिकाणी २४ तासांच्या पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. यासाठी महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, जलसंपदा विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.बैठकीत उल्हासनगरातील २४ तासांची पाणीकपात १२ तासांवर आणण्याकरिता चर्चा झाली. भिवंडी शहरातील पाणीगळती, होणारा टँकरचा पाणीपुरवठा विकासकांसह डाइंग प्रोसेसिंग कारखान्यांना होत असल्याच्या मुद्यावरही या वेळी चर्चा झाली. मीरा-भार्इंदर महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा केल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणार नाही. अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी सहा महिन्यांत वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. तसेच २४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाकडे असून पाच एमएलडीचे काम आधीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)