शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:30 IST

धन-धान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’स केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सहा वर्षांसाठी मंजुरी दिली. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या १०० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या जिल्ह्यांमधील उत्पादन वाढवणे, पीक विविधीकरण, शाश्वत शेती, आधुनिक साठवणूक आणि प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे कर्ज देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वार्षिक २४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत ३६ योजना एकत्र केल्या आहेत. पिकांचे विविधकरण व टिकाऊ शेती पद्धती यांना या योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली.

तीन निकषांवर जिल्ह्यांची निवड कमी उत्पादकता, कमी पीक घनता व कमी कर्ज वितरण अशा ३ निकषांच्या आधारे देशातील १०० जिल्हे निवडण्यात येतील. प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा योजनेत सहभागी करून घेण्यात येईलच. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात योजनेच्या मासिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी ११७ प्रमुख मानके निश्चित करण्यात आली आहेत. नीती आयोग याचा आढावा घेईल. 

दोन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी 

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि प्रकल्प महामंडळाला अधिक बळकटी देण्यासाठी सरकारने २० हजार कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. याचा वापर सौर, पवन, हरित हायड्रोजन सारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाईल.

नॅशनल क्लीन इन्व्हेस्टमेंट लिमिटेडला स्वच्छ तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण साठवणुकीसाठी ७,००० कोटी रुपयांचे नवीन भांडवल मिळेल. हे नवीन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण ऊर्जा साठवणूक, बॅटरी, स्मार्ट ग्रिडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले जाईल.

पंचायत पातळीवर पिके साठवली जातीलया योजनेत उच्च उत्पादन आणि पीक विविधतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. स्वस्त दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील. 

उत्पादनांच्या साठवणुकीसाठी पंचायत-स्तर व ब्लॉक-स्तरावर गोदामे, शीतगृहे, मूल्यवर्धन युनिट्स तयार केली जातील. 

माती-जल संवर्धन, सेंद्रिय शेती आणि जलसंधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. 

टॅग्स :Farmerशेतकरी