शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:30 IST

धन-धान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’स केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सहा वर्षांसाठी मंजुरी दिली. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या १०० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या जिल्ह्यांमधील उत्पादन वाढवणे, पीक विविधीकरण, शाश्वत शेती, आधुनिक साठवणूक आणि प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारे कर्ज देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वार्षिक २४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत ३६ योजना एकत्र केल्या आहेत. पिकांचे विविधकरण व टिकाऊ शेती पद्धती यांना या योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली.

तीन निकषांवर जिल्ह्यांची निवड कमी उत्पादकता, कमी पीक घनता व कमी कर्ज वितरण अशा ३ निकषांच्या आधारे देशातील १०० जिल्हे निवडण्यात येतील. प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा योजनेत सहभागी करून घेण्यात येईलच. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात योजनेच्या मासिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी ११७ प्रमुख मानके निश्चित करण्यात आली आहेत. नीती आयोग याचा आढावा घेईल. 

दोन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी 

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि प्रकल्प महामंडळाला अधिक बळकटी देण्यासाठी सरकारने २० हजार कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. याचा वापर सौर, पवन, हरित हायड्रोजन सारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जाईल.

नॅशनल क्लीन इन्व्हेस्टमेंट लिमिटेडला स्वच्छ तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण साठवणुकीसाठी ७,००० कोटी रुपयांचे नवीन भांडवल मिळेल. हे नवीन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण ऊर्जा साठवणूक, बॅटरी, स्मार्ट ग्रिडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले जाईल.

पंचायत पातळीवर पिके साठवली जातीलया योजनेत उच्च उत्पादन आणि पीक विविधतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. स्वस्त दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील. 

उत्पादनांच्या साठवणुकीसाठी पंचायत-स्तर व ब्लॉक-स्तरावर गोदामे, शीतगृहे, मूल्यवर्धन युनिट्स तयार केली जातील. 

माती-जल संवर्धन, सेंद्रिय शेती आणि जलसंधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. 

टॅग्स :Farmerशेतकरी