शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:19 IST

राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

नागपूर : राज्य शासनातर्फे दोन टप्प्यांत ७२ हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के पदे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राखीव ठेवण्यात येतील. त्यानंतरच ती पदे भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत केली.राजकारण करण्याच्या आपल्याला अनेक जागा आहेत. पण जेथे शेकडो वर्षांपासून राज्यभरातील गोरगरीब शेतकरी विठ्ठलभेटीच्या ओढीने येतात तेथे जाऊन राजकारण करू नये. तसे झाले तर ते त्या वारकऱ्यांविरुद्धचे आंदोलन ठरेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.मराठा समाजातील युवकांना शासनाने शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतिगृहांची सोय असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.> विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाबाबत शासनाने कायदा केला.

> न्यायालयीन प्रक्रियेत ही बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. त्याच्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचे निधन झाल्याने न्या. गायकवाड यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. सध्या आयोगाच्या अध्यक्षांमार्फत प्रक्रिया सुरू असून त्यांच्या मार्फत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.> या आयोगाच्या अहवालानुसार आरक्षणाबाबत शासन निर्णय घेईल. शासनाच्या वतीने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू.महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखणारमराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास विठ्ठलाच्या पूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखू, असा इशारा नाशकात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. पंढरपुरात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतदेखील असाच इशारा देण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हास्यास्पदमराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखून ठेवण्याचे केलेले वक्तव्य हास्यास्पद व सुप्रीम कोर्टाचा अवमान त्यातून होत आहे. - अ‍ॅड प्रकाश आंबेडकर,भारिप, बहुजन महासंघाचे नेते

धनगर आरक्षणाचा अहवाल तयार : धनगर आरक्षणासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, यासाठी टाटा सामाजिक संस्थेचा सर्व्हे पूर्ण झाला असून, त्यांचा अहवालही तयार झाला आहे. तो लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार असून तो अहवाल आला की आपण लगेचच त्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करु.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८marathaमराठा